शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणे शक्य, दूरसंचार सल्लागार समितिची बैठक संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:20 IST

नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणो शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सोलंकी यांना शुक्र वारी केल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कल्याण : नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणो शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सोलंकी यांना शुक्र वारी केल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बीएसएनएलचे भारत जोडो अभियान प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचणो आवश्यक असून त्यासाठी नेवाळी, श्री मलंगगड, शहापूर, मुरबाड, जव्हार आदी भागात बीएसएनएलने टॉवर उभारण्याची आवश्यकता खा. डॉ. शिंदे यांनी प्रतिपादित केली. मात्न, अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नसल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यावर त्यावर हॉटस्पॉट सुविधा पुरवण्याचा तोडगा डॉ. शिंदे यांनी सुचवला.

बीएसएनएलच्या कामांचा आढावा आणि पुढील वाटचाल यासाठी दूरसंचार सल्लागार समतिीची बैठक पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण येथील बीएसएनएल निगम कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार  शिंदे, कपिल पाटील, आमदार बालाजी किणीकर, बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक श्री. कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक ठाकरे व  भाटीया आदी अधिकारी उपस्थित होते. बीएसएनएलच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कारभारावर यावेळी सर्व सल्लागार समतिी सदस्यांनी ताशेरे ओढले. 2014 पासून माया घरातील बीएसएनएलचा लँडलाइन बंद असल्याचे सांगत बैठकीचे अध्यक्ष खा. चिंतामण वनगा यांनी बीएसएनएलला घराचा आहेर दिला.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील बीएसएनएलची सेवा डबघाईला आली असून याचा फायदा इतर प्रतिस्पर्धी कंपन्या उचलण्याची भीती यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेता रमेश जाधव, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्ने, निखील वाळेकर, दशरथ घाडीगावकर, महिला संघटक कविता गावंड आदी उपस्थित होते.       

मलंगगड भागामध्ये  2007 साली बीएसएनएलने लाइन टाकण्यास सुरु वात केली होती. मात्न, खर्च वाढल्यामुळे 2009 मध्ये हे काम बंद करण्यात आले. याशिवाय अंबरनाथ येथे स्वत:ची जागा असून देखील बीएसएनएलने दुसर्याच्या जागेत कार्यालय थाटले आहे आणि त्याचे महिन्याकाठी ? लाख रु पये भाडे देखील बीएसएनएल भरते आहे बीएसएनएलचा असा भोंगळ कारभार सर्वच ठिकाणी सुरू असल्याची बाब खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीत मांडली. सर्वच सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिसेस तसेच, बँकांमध्ये बीएसएनएलचे नेटवर्क वापरण्यात येत असून नेटवर्क धीम्या गतीने सुरु  असण्याचा मनस्ताप विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि वयोवृद्ध अशा सर्वच स्तरातील नागरिकांना विनाकारण सोसावा लागत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :WiFiवायफायthaneठाणे