शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:22 IST

१५ डिसेंबरचे अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

भाईंदर : मीरा-भाईंदरला वीजपुरवठा करणारी तत्कालिन रिलायन्स एनर्जी ही कंपनी ताब्यात घेताच अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीने वीजदरात तब्बल १८ टक्के वाढ केली. ही दरवाढ बेकायदा असल्याचा दावा करत ती त्वरित मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ती १५ डिसेंबरपर्यंत मान्य न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे.दर चार वर्षांनी वीज नियामक आयोगाकडून पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दरवाढ करण्यास परवानगी दिली जाते. त्याचा दर ०.२५ टक्के इतका अपेक्षित असतो. परंतु, त्यात यंदा भरमसाठ वाढ करून ग्राहकाच्या माथी अव्वाच्यासवा वाढीव दराचे वीज बिल दिल्याचे सावंत यांनी सांगितले.पूर्वी शहराला रिलायन्स एनर्जी कंपनीकडून वीजपुरवठा केला जात होता. ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीने आॅगस्ट २०१८ मध्ये ताब्यात घेतली. यानंतर कंपनीने वीज दरात सरसकट १८ टक्के वाढ करून ग्राहकांच्या माथी वाढीव दराची बिले मारली आहेत. यामुळे ग्राहक त्रस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.कंपनीने केलेली वीजदरवाढ बेकायदा असून ती वीज नियामक आयोगाच्या कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. दरवाढ मागे घेऊन वीज नियामक आयोगाच्या परवानगीनेच ती लागू करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. ही दरवाढ मागे घेण्यासाठी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटीच्या भार्इंदर येथील उत्तर विभागीय कार्यालयातील अधिकाºयांची मंगळवारी भेट घेत त्यांना निवेदन दिले.ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सुरूयाबाबत कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विजेंद्र भावसार यांनी सांगितले की, तत्कालिन रिलायन्स एनर्जी कंपनीने २२ डिसेंबर २०१७ रोजी आयोगाकडे वीजदरवाढीची याचिका दाखल केली होती. त्यावर २ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी होऊन आयोगाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. २८ आॅगस्ट रोजी ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटीने ताब्यात घेतल्यानंतर आयोगाने १२ सप्टेंबरला दरवाढीचा निर्णय दिला.तो १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला. त्यातच आॅक्टोबर हिटमुळे वीजवापर वाढल्याने शुल्क वाढले. त्यानुसारच ग्राहकांना बिले दिली असून त्यात दरवाढीपेक्षा जास्त तफावत असल्यास ती पुढील बिलातून आपोआप वळती केली जाते. याबाबत ग्राहकांचे शंका निरासन करण्यासाठी कंपनीने १५ डिसेंबरपर्यंत शिबिरांचे आयोजन केले असून २४ तास हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीजbhayandarभाइंदरcongressकाँग्रेस