शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

फलक अन् पोस्टरवर कारवाई होणार

By admin | Updated: January 3, 2017 05:36 IST

शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे.

ठाणे : शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्वच फलकांवर तत्काळ कारवाई करावी अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत लावून धरली. त्यानुसार हे फलक तत्काळ काढण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शहराच्या विविध भागातील रस्ते आणि पदपथांवर लोखंडी फ्रेममध्ये फलक उभारले असून यामध्ये राजकीय पक्ष, मंडळे आणि विविध संस्था आघाडीवर आहेत. तसेच अनेक ठिकाणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांनी झेंड्यासाठी खांब उभे केले आहेत. रस्त्यावर उभारलेल्या फलकामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच पदपथाच्या मधोमध ते उभारल्याने त्या ठिकाणाहून नागरिकांना चालणे शक्य होत नाही. यामुळे अपघात होऊ शकतात.या संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी असे बेकायदा फलक आणि खांब कोणत्याही पक्षाचे असो सर्व ठिकाणी एकसारखीच कारवाई करावी आणि नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून द्याावेत, अशी मागणी केली. मात्र, ती कोणत्या भागातून सुरू करावी, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जुंपली. वागळे इस्टेट भागातील आयटीआय सर्कलपासून ती कारवाई सुरू करावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातून ती झाल्यास सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरुवात इतर ठिकाणापासून करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशाप्रकारची कारवाई शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)