शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

तेल आणि दूधामध्ये भेसळ करणा-यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार -जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:51 PM

शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टीक तसेच सकस अन्न पदार्थ मिळण्याबाबतची देशातील पहिली कार्यशाळा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठळक मुद्देशाळा महाविद्यालयांमधील उपहारगृहांमध्ये सकस अन्न मिळावेदेशातील पहिली कार्यशाळा ठाण्यातजंक फूडकडे युवापिढी आकर्षित होत असने चिंता

ठाणे: अयोग्य अन्न सेवनाने तसेच आरोग्याची योग्य ती काळजी न घेतल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह आणि हह्दयरोगासारखे आजार आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांमधील उपहारगृहांबाबतचे धोरण विकसित करण्यात येणार आहे. तसेच तेल आणि दूधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करणार असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी गुरु वारी दिला आहे.शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टीक तसेच सकस अन्न पदार्थ मिळण्याबाबतची देशातील पहिली कार्यशाळा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, कोकण विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्यासह ठाणे, नवी मुंबई तसेच राज्यातील अनेक शाळा - महाविद्यालयांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. पोटाचे विकार वाढविणाºया जंक फूडकडे युवापिढी आकर्षित होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा अन्न पदार्थाची चव चांगली असली तरी त्याचे दूरगामी परिणाम हे वाईट आहेत. १२ ते १७ वयोगटातील तरु ण पिढीमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार बळावत असल्यामुळे मुलांना सकस आहार मिळावा, याकडे पालकांबरोबर शाळा महाविद्यालयाच्या प्रशासनानेही अधिक व्यापकपणाने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी तेथील उपहारगृहांमध्ये प्रोटीनयुक्त सकस अन्न पदार्थांची विक्र ी करण्यावर शालेय प्रशासनाने जोर देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपहारगृहांबाबतचे धोरण विकसित केले जाणार आहे. फास्ट फूडला पर्याय शोधून ते हद्दपार करण्याची आवश्यकता आहे. उपहारगृहांमध्ये पाणी, अन्न पदार्थाची गुणवत्ता चांगली राखली जाण्याबाबतही अन्न व औषध प्रशासनाकडून आग्रह धरला जाणार असून तशी अंमलबजावणीही केली जाणार आहे. फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळांचीही संख्या वाढवून उपहारगृहांमध्ये तपासणी केली जाणार आहे. शाळा महाविद्यालय परिसरांमध्ये आरोग्यवर्धक तसेच गुणवत्ता न ठेवणाºया उपहारगृह चालकांवर कारवाईचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. स्वस्थ व निरोगी भारत घडविण्यासाठी ‘जंकफूड टाळूया आणि आपले आरोग्य सांभाळूया ’ असा संदेशही रावळ यांनी यावेळी दिला.ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही मुलांमध्ये वाढीस लागलेली जंकफूड खाण्याच्या वृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. ठाणे महापालिकांमधील शाळा तसेच श्री मॉ निकेतन सारख्या शाळांमधून पोषण आहाराची काळजी घेण्यात येत असल्याचा त्यांनी खास उल्लेख केला. सर्वच शाळांनी मुलांना पौष्टीक आहार मिळण्याच्या मोहीमेमध्ये सक्र ीय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.उपहारगृहांमधून तसेच शाळेतील डब्यांमध्ये पालकांनी कोणते जेवण द्यावे याकडे शालेय प्रशासनानेही अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे पल्लवी दराडे म्हणाल्या. दिवाळीतील फटाक्यांबद्दल ध्वनी व वायू प्रदूषणाची जनजागृती आणि धुळवडीमध्ये रंगांमुळे होणाºया प्रदूषणाबाबतच्या जनजागृतीमुळे जसे मुलांमध्ये सकारात्मक बदल झाले. तसेच सकारात्मक बदल आता योग्य आहाराबाबतच्या धोरणाने घडून येतील, असा विश्वासही दराडे यांनी व्यक्त केला.यावेळी शाळेतून योग्य आहारासाठी पुढाकार घेणा-या नवी मुंबईतील लोकमान्य, होरायजन, सानपाडा आणि रिलायन्स या शाळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरु पात सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेला मुंबईचे एएफएसटीचे अध्यक्ष निलेश लेले, डॉ. प्रबोध हळदे आणि ईट राईट मुवमेंटचे डॉ. जगमित मदान यांनी मार्गदर्शन केले.अन्न व औषध प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पोषक, पौष्टीक, सुरक्षित आणि स्वच्छतेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शत तत्वे दिली आहेत. ती आतापर्यंत १६ हजार ९२५ शाळा महाविद्यालयांमध्ये पोहचविण्यात आली आहेत. त्यापैकीच ठाणे आणि पालघर जिल्हयातील ६० शाळा महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपहारगृह चालक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेFDAएफडीए