शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

रेल्वे रूळ ओलांडताना साडेतीन हजारांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:03 AM

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.

ठाणे - एका फलाटावरून दुसऱ्या फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी बिनदिक्कत रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात वाढले आहेत. २०१७ ते २०१९ या कालावधीत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली. ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि ट्रार्न्स हार्बर यांच्या लोकलसह एक्स्प्रेस गाड्या दररोज धावतात. ठाणे रेल्वे स्थानकात तब्बल दहा फलाट आहेत. एका फलाटाहून दुसºया फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलांचा वापर करण्यापेक्षा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात व जीव धोक्यात घालतात. अशा प्रवाशांविरोधात ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते तरी काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याची खोड सोडत नसल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मागील तीन वर्षात ३ हजार ३१३ जणांना पकडून त्या प्रवाशांकडून १०० रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली गेली आहे. २०१७ मध्ये १ हजार १५७ जणांना रुळ ओलांडताना आरपीएफ पोलिसांनी पकडले. २०१८ मध्ये हे प्रमाण अर्ध्यावर आले होते. त्या वर्षात ६०१ जणांना पकडले होते. ही बाब आरपीएफ पोलिसांसाठी आणि रेल्वे प्रशासनासाठी सुखद बाब होती. परंतु २०१९ मध्ये प्रमाण दुपटीने वाढले. या वर्षात १ हजार ५५५ जणांना पकडण्यात आल्याची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर दररोज ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. तरीसुद्धा हे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याचे आरपीएफ पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.रेल्वे पुलांची कामे रखडल्याचा परिणाम : ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील रेल्वे पूल दीर्र्घकाळ दुरुस्तीकरिता बंद केलेला आहे. डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पूल दीर्घकाळ बंद होता. अलिकडेच तो पाडून टाकला. रेल्वे प्रशासन वाढत्या गर्दीकरिता पूल उपलब्ध करुन देत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली पूल महिनोनमहिने बंद ठेवले जातात. त्यामुळे रुळ ओलांडताना होणाºया अपघाताकरिता आरपीएफ, रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन हेही तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.

टॅग्स :thaneठाणेMumbai Localमुंबई लोकल