शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रूळ ओलांडताना साडेतीन हजारांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 02:04 IST

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.

ठाणे - एका फलाटावरून दुसऱ्या फलाटापर्यंत पोहोचण्यासाठी बिनदिक्कत रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार ठाणे स्थानकात वाढले आहेत. २०१७ ते २०१९ या कालावधीत ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडताना पकडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली. ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील फलट क्रमांक दोन व चारच्या दरम्यानचा पूल बंद असल्याने रेल्वे प्रशासन हेही रुळ ओलांडण्याच्या घटनांकरिता तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे आणि ट्रार्न्स हार्बर यांच्या लोकलसह एक्स्प्रेस गाड्या दररोज धावतात. ठाणे रेल्वे स्थानकात तब्बल दहा फलाट आहेत. एका फलाटाहून दुसºया फलाटावर जाण्यासाठी पादचारी पुलांचा वापर करण्यापेक्षा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात व जीव धोक्यात घालतात. अशा प्रवाशांविरोधात ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते तरी काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडण्याची खोड सोडत नसल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मागील तीन वर्षात ३ हजार ३१३ जणांना पकडून त्या प्रवाशांकडून १०० रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली गेली आहे. २०१७ मध्ये १ हजार १५७ जणांना रुळ ओलांडताना आरपीएफ पोलिसांनी पकडले. २०१८ मध्ये हे प्रमाण अर्ध्यावर आले होते. त्या वर्षात ६०१ जणांना पकडले होते. ही बाब आरपीएफ पोलिसांसाठी आणि रेल्वे प्रशासनासाठी सुखद बाब होती. परंतु २०१९ मध्ये प्रमाण दुपटीने वाढले. या वर्षात १ हजार ५५५ जणांना पकडण्यात आल्याची नोंद आहे. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर दररोज ठाणे आरपीएफ पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. तरीसुद्धा हे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याचे आरपीएफ पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.रेल्वे पुलांची कामे रखडल्याचा परिणाम : ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील रेल्वे पूल दीर्र्घकाळ दुरुस्तीकरिता बंद केलेला आहे. डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पूल दीर्घकाळ बंद होता. अलिकडेच तो पाडून टाकला. रेल्वे प्रशासन वाढत्या गर्दीकरिता पूल उपलब्ध करुन देत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली पूल महिनोनमहिने बंद ठेवले जातात. त्यामुळे रुळ ओलांडताना होणाºया अपघाताकरिता आरपीएफ, रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन हेही तेवढेच जबाबदार असल्याची प्रवाशांची भावना आहे.

टॅग्स :thaneठाणेMumbai Localमुंबई लोकल