शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मुंब्य्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:42 IST

दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीतून होणार सुटकारस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार

ठाणे -मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई बुधवार पासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बुधवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सुरु झाले. या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामुळे येत्या काही दिवसात हा रस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. या ४ किमीच्या मार्गावरील १९० कुटुंबांचे पुनर्वसन बाजूलाच असलेल्या दोस्तीच्या रेंटलच्या घरांमध्ये करण्यात आले आहे.                                     बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथील रस्त्याच्या दुतर्फा ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. यावेळी आयुक्तांसमवेत अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले, उपायुक्त संदीप माळवी आदींसह इतर पालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. वाय जंक्शन ते कल्याणफाटा हा सुमारे ४ किमीचा रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतुक कोंडी लक्षात घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या हा रस्ता २५ ते ३० मीटरच्या आसपास आहे. परंतु रुंदीकरणानंतर हा रस्ता ६० मीटरचा होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली तळ अधिक चार ते सात मजल्याच्या ६ इमारती, ३० बांधकामे, भारत गिअर कंपनीचा गेट, २० ते २५ गॅरेजवाले व इतर व्यावसायिक आदींवर यावेळी हातोडा टाकण्यात आला. तर या भागातील १९० कुटुंबांचे जवळील दोस्तीच्या रेंटलच्या घरात केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण जरी पालिका करणार असली तरी रस्त्याचे काम हे एमएमआरडीए मार्फतचे केले जाणार आहे.चौकट - ऐरोली ते काटई नाका पर्यंतच्या होऊ घातलेल्या उन्नती मार्गातील ६० मीटरचा भाग हा येथूनच जात आहे. परंतु आता येथील रहिवाशांची चर्चा झाली असून त्यांनी जमीन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न सुध्दा सुटणार असल्याचा आशावाद यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाmmrdaएमएमआरडीए