शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंब्य्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:42 IST

दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीतून होणार सुटकारस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार

ठाणे -मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई बुधवार पासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बुधवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सुरु झाले. या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामुळे येत्या काही दिवसात हा रस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. या ४ किमीच्या मार्गावरील १९० कुटुंबांचे पुनर्वसन बाजूलाच असलेल्या दोस्तीच्या रेंटलच्या घरांमध्ये करण्यात आले आहे.                                     बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथील रस्त्याच्या दुतर्फा ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. यावेळी आयुक्तांसमवेत अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले, उपायुक्त संदीप माळवी आदींसह इतर पालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. वाय जंक्शन ते कल्याणफाटा हा सुमारे ४ किमीचा रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतुक कोंडी लक्षात घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या हा रस्ता २५ ते ३० मीटरच्या आसपास आहे. परंतु रुंदीकरणानंतर हा रस्ता ६० मीटरचा होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली तळ अधिक चार ते सात मजल्याच्या ६ इमारती, ३० बांधकामे, भारत गिअर कंपनीचा गेट, २० ते २५ गॅरेजवाले व इतर व्यावसायिक आदींवर यावेळी हातोडा टाकण्यात आला. तर या भागातील १९० कुटुंबांचे जवळील दोस्तीच्या रेंटलच्या घरात केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण जरी पालिका करणार असली तरी रस्त्याचे काम हे एमएमआरडीए मार्फतचे केले जाणार आहे.चौकट - ऐरोली ते काटई नाका पर्यंतच्या होऊ घातलेल्या उन्नती मार्गातील ६० मीटरचा भाग हा येथूनच जात आहे. परंतु आता येथील रहिवाशांची चर्चा झाली असून त्यांनी जमीन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न सुध्दा सुटणार असल्याचा आशावाद यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाmmrdaएमएमआरडीए