शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नियम तपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर कारवाई, आयुक्तांचे महासभेत संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:11 IST

आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात, तिच्या आधारे दुसराच न्यायालयात याचिका दाखल करतो. काही वेळेस ती मागे घेतली जाते. काही जण ठराविक विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. त्यामुळे पोलिसांकडून याची तपासणी करून कायदेशीरबाबी तपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

ठाणे : आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात, तिच्या आधारे दुसराच न्यायालयात याचिका दाखल करतो. काही वेळेस ती मागे घेतली जाते. काही जण ठराविक विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. त्यामुळे पोलिसांकडून याची तपासणी करून कायदेशीरबाबी तपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.विधानसभेत झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने बुधवारी ठाणे महापालिकेच्या महासभेतदेखील राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या मुद्याला हात घातला. आरटीआय कार्यकर्त्यांना पालिकेत काही अधिकारी अशा कार्यकर्त्यांचे जास्त मनोरंजन करतात, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कितपत माहिती द्यावी, कोणती देऊ नये, एक कार्यकर्ता किती वेळा ती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले. तर या कार्यकर्त्यांना बाजूची खुर्ची देऊन नगरसेवकांना ताटकळत ठेवण्याचे प्रकारही काही अधिकाºयांकडून सुरू असल्याचे नगरसेवक अशोक वैती यांनी निर्दशनास आणले.दरम्यान विधानसभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेतदेखील यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या. प्रशासनाच्या वतीने मागील महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यातून काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादा व्यक्ती वारंवार एका विभागात एकाच विषयासाठी प्रश्न विचारतात, माहिती घेणारे आणि न्यायालयात जाणारे हे दुसरेच असतात, काही व्यक्तीतर एकाच विभागात सुमारे ६० हून अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कालांतराने ती मागेही घेतली जाते. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित राहत आहेत.आरटीआयअंतर्गत अर्ज करण्याबाबत माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, अशा पद्धतीने एकाच विभागात अर्ज करून त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करून, कायदेशीर बाबींचा तपास करून नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका