शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दुकानांवर सायंकाळी ७ नंतर कारवाई सुरू; दुकाने रात्री १०पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 21:34 IST

तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. 

मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी असल्याने त्यानंतर दुकाने सुरू दिसताच पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. २ ऑक्टोबरपर्यंत मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १८ हजार ८७० इतके कोरोनाचे रुग्ण झाले असून, त्या पैकी १६ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. १ हजार ९८६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

एकीकडे अनलॉकमुळे शहरातील व्यवहार सुरू झालेले असल्याने लोकांची गर्दी वाढत आहे. त्यातच मास्क घालायचा नाही वा अर्धवट दिखाव्याला घालायचा, गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन सर्रास सुरू आहे. जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ही सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी परवानगी दिली होती. दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे बंधनकारक करत उल्लंघन केल्यास दंड आकारणीचा इशारा दिला होता . 

परंतु शहरात सायंकाळी ७ नंतरदेखील अनेक जण दुकाने उघडी ठेवत आहेत. काही जण अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करत. जेणेकरून सायंकाळी ७ नंतर देखील गर्दी होत असल्याने अखेर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या शोरूमसह दुकानदारांवर २ हजार रुपये दंड आकारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. दुकानदार वाद घालतात म्हणून सोबत पोलीस कर्मचारीदेखील असतात. तर दुकानांची वेळ आता सायंकाळी ७ ऐवजी रात्री १० पर्यंत वाढवून द्या, अशी मागणी भाजपा नगरसेवक एड रवी व्याससह दुकानदारांनी चालवली आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असून वेळ वाढवून दिल्यास दिलासा मिळेल असे व्यास म्हणाले. मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून जरूर कठोर कारवाई करा, पण दुकानाची वेळ वाढवून द्या अशी मागणी होत आहे.