शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न

By अजित मांडके | Updated: August 25, 2023 18:14 IST

कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे.

ठाणे: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. गुरुवारी ६५ झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी देखील सांयकाळ पर्यंत ५५ ते ६० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु शुक्रवारी याठिकाणी राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यातही ही कारवाई टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले. मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरुच होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पुनर्वसन मागणी करीत पुलाखालीच आपला संसार थाटला आहे.

ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून सध्या ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली कारवाई सांयकाळी थांबविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बुल्डोजर फिरविला गेला. यावेळी रहिवाशांना आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पालिकेने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. तर शुक्रवारी जवळ जवळ सर्वच पक्षाच्या मंडळींनी येथे हजेरी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानंतरही ही कारवाई सुरुच होती. अखेर सांयकाळ पर्यंत पुन्हा ५५ ते ६० झोडपड्यांवर कारवाई करण्यात आली.

पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून खणला खड्डायापूर्वी देखील महापालिकेच्या माध्यमातून या भागात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम होतांना दिसून आले. परंतु शुक्रवारी कारवाई करतांना महापालिकेने थेट पोकलेनच खाली उतरला आणि बांबू काढतांना त्याठिकाणी खड्डा खणला. काही ठिकाणी अशाच पध्दतीने खड्डा खणल्याचे दिसून आले. त्यात खाडीचे पाणी जाऊन साचू लागले आहे. केवळ याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठीच ही शक्कल लढविण्याचे दिसून आले.

पुलाखालीच थाटला संसारमहापालिकेने कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांना आपल्या मुलाबाळांसह येथील पुलाखालीच संसार थाटल्याचे दिसून आले. पुनर्वसनाची मागणी करीत हे रहिवासी आक्रमक झाले होते. त्यातही ज्या काही झोपड्यांवर कारवाई झाली, त्यातील काही झोपड्यांच्या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

१४० रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आग्रहीखाडीत झोपड्या बांधल्या गेल्या असल्या तरी येथील १४० रहिवासी हे २०११ पासून याठिकाणी वास्तव्यास असल्याने मानवतेच्या दृष्टीकोणातून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी राजकीय मंडळींनी केली आहे. त्यानुसार त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात रेंटलच्या घरात आणि नंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे