शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न

By अजित मांडके | Updated: August 25, 2023 18:14 IST

कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे.

ठाणे: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. गुरुवारी ६५ झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी देखील सांयकाळ पर्यंत ५५ ते ६० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु शुक्रवारी याठिकाणी राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यातही ही कारवाई टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले. मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरुच होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पुनर्वसन मागणी करीत पुलाखालीच आपला संसार थाटला आहे.

ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून सध्या ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली कारवाई सांयकाळी थांबविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बुल्डोजर फिरविला गेला. यावेळी रहिवाशांना आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पालिकेने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. तर शुक्रवारी जवळ जवळ सर्वच पक्षाच्या मंडळींनी येथे हजेरी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानंतरही ही कारवाई सुरुच होती. अखेर सांयकाळ पर्यंत पुन्हा ५५ ते ६० झोडपड्यांवर कारवाई करण्यात आली.

पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून खणला खड्डायापूर्वी देखील महापालिकेच्या माध्यमातून या भागात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम होतांना दिसून आले. परंतु शुक्रवारी कारवाई करतांना महापालिकेने थेट पोकलेनच खाली उतरला आणि बांबू काढतांना त्याठिकाणी खड्डा खणला. काही ठिकाणी अशाच पध्दतीने खड्डा खणल्याचे दिसून आले. त्यात खाडीचे पाणी जाऊन साचू लागले आहे. केवळ याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठीच ही शक्कल लढविण्याचे दिसून आले.

पुलाखालीच थाटला संसारमहापालिकेने कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांना आपल्या मुलाबाळांसह येथील पुलाखालीच संसार थाटल्याचे दिसून आले. पुनर्वसनाची मागणी करीत हे रहिवासी आक्रमक झाले होते. त्यातही ज्या काही झोपड्यांवर कारवाई झाली, त्यातील काही झोपड्यांच्या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

१४० रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आग्रहीखाडीत झोपड्या बांधल्या गेल्या असल्या तरी येथील १४० रहिवासी हे २०११ पासून याठिकाणी वास्तव्यास असल्याने मानवतेच्या दृष्टीकोणातून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी राजकीय मंडळींनी केली आहे. त्यानुसार त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात रेंटलच्या घरात आणि नंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे