शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

उत्पादन शुल्कची दिवा भागातील दारू अड्डयांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:04 IST

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने दिवा, दातिवली परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर गुरुवारी सकाळी धाडसत्र राबविले.

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाने दिवा, दातिवली परिसरातील गावठी दारुच्या अड्डयांवर गुरुवारी सकाळी धाडसत्र राबविले. या धाडीत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारूसह इतर सामुग्री असा एक लाख सात हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, ठाण्याचे अधीक्षक एन. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पी. पी. घुले आदींच्या पथकाने १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान दातिवली आणि दिवा गावाच्या पश्चिमेकडील सूर्यानगर आणि बिराणा या परिसरात गावठी दारुची विक्री करणा-या मिलिंद मुरलीधर पाटील (४०, रा. दातिवली, ठाणे), प्रशांत काळे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) आणि किरण त्र्यंबक मोकाशी (६५, रा. बिराणा, ठाणे) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १९८० लीटर गावठी दारु, प्लास्टीकच्या कॅनसह इतर सामुग्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई- नाना पाटीलब-याचदा कारवाई करणा-या पथकाची चाहूल लागताच आरोपी निसटतात. गुरुवारच्या दिव्यातील कारवाईमध्ये मात्र तीन मद्य विक्रेत्यांना अटक करण्यात आल्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकालानंतर मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणे