शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बेकायदा मंडपांवर उल्हासनगरात टाच, धाबे दणाणले, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:31 IST

शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे.

उल्हासनगर : शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर पालिकेने शनिवारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत.उल्हासनगरातील अनेक मंडळांनी महापालिका परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप उभारले. त्यामुळे नागरिकांना येजा करण्यास तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही जाऊ शकत नव्हत्या. याबाबत, ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार, न्या. अभय ओक व रियाज इकबाल छागला यांच्या खंडपीठाने विनापरवाना रस्त्यात उभारलेल्या गणेश मंडपांवर कारवाईचे आदेश दिले. शहरात बेकायदा मंडपे उभारल्याची बाब हिराली फाउंडशेनने न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिली. फाउंडेशनचे वकील सना बागवाला यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.हिराली फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी बेकायदा मंडपांची छायाचित्रेच फाउंडेशनने न्यायालयात सादर केली. महापालिकेतर्फे सहायक आयुक्त मनीष हिवरे उपस्थित होते. एकाही गणेश मंडळाला शुक्रवारपर्यंत मंडप उभारण्याची परवानगी दिलेली नाही. असे सांगताना बेकायदा उभारलेल्या मंडपांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन न्यायालयात दिले. न्यायालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास हिवरे यांना सांगितले.कॅम्प नं. ४ येथील बगाडे डेकोरेटर येथे रस्त्यावर बांधलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर शनिवारी हिवरे यांनी कारवाई केली. तर, कॅम्प नं. १ डी.टी. कलानी कॉलेजजवळ उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीला लागून एका मंडळाने बेकायदा मंडप उभारला आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा मंडप उभारण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांना स्वत:हून ते हटवावे लागणार आहेत.दरम्यान, फाउंडेशनने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न ऐन दहीहंडी सणादरम्यान लावून धरला. त्यामुळे डीजेचा वापर दहीहंडीत न करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला. परिणामी, शहरात दहीहंडी उत्सव साजरा झाला का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.एका दिवसात २१५ मंडळांना परवानग्या?महापालिकेची परवानगी न घेता अनेक गणेश मंडळांनी मंडप उभारले. जनहित याचिकेमुळे अशा मंडपांवर भरपावसात कारवाई करण्याची वेळ महापालिकेवर ओढवली आहे. शुक्रवारपर्यंत एकाही गणेश मंडळाला परवानगी दिलेली नव्हती. शनिवारी १६ मंडळांना, तर रविवारी २१५ मंडळांना मंडपांची परवानगी दिली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव