शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बेकायदा मंडपांवर उल्हासनगरात टाच, धाबे दणाणले, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:31 IST

शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे.

उल्हासनगर : शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर पालिकेने शनिवारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत.उल्हासनगरातील अनेक मंडळांनी महापालिका परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप उभारले. त्यामुळे नागरिकांना येजा करण्यास तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही जाऊ शकत नव्हत्या. याबाबत, ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार, न्या. अभय ओक व रियाज इकबाल छागला यांच्या खंडपीठाने विनापरवाना रस्त्यात उभारलेल्या गणेश मंडपांवर कारवाईचे आदेश दिले. शहरात बेकायदा मंडपे उभारल्याची बाब हिराली फाउंडशेनने न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिली. फाउंडेशनचे वकील सना बागवाला यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.हिराली फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी बेकायदा मंडपांची छायाचित्रेच फाउंडेशनने न्यायालयात सादर केली. महापालिकेतर्फे सहायक आयुक्त मनीष हिवरे उपस्थित होते. एकाही गणेश मंडळाला शुक्रवारपर्यंत मंडप उभारण्याची परवानगी दिलेली नाही. असे सांगताना बेकायदा उभारलेल्या मंडपांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन न्यायालयात दिले. न्यायालयाने याबाबतचा सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास हिवरे यांना सांगितले.कॅम्प नं. ४ येथील बगाडे डेकोरेटर येथे रस्त्यावर बांधलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर शनिवारी हिवरे यांनी कारवाई केली. तर, कॅम्प नं. १ डी.टी. कलानी कॉलेजजवळ उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीला लागून एका मंडळाने बेकायदा मंडप उभारला आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा मंडप उभारण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांना स्वत:हून ते हटवावे लागणार आहेत.दरम्यान, फाउंडेशनने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न ऐन दहीहंडी सणादरम्यान लावून धरला. त्यामुळे डीजेचा वापर दहीहंडीत न करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला. परिणामी, शहरात दहीहंडी उत्सव साजरा झाला का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.एका दिवसात २१५ मंडळांना परवानग्या?महापालिकेची परवानगी न घेता अनेक गणेश मंडळांनी मंडप उभारले. जनहित याचिकेमुळे अशा मंडपांवर भरपावसात कारवाई करण्याची वेळ महापालिकेवर ओढवली आहे. शुक्रवारपर्यंत एकाही गणेश मंडळाला परवानगी दिलेली नव्हती. शनिवारी १६ मंडळांना, तर रविवारी २१५ मंडळांना मंडपांची परवानगी दिली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव