शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:07 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली.

ठाणे / टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली. कल्याण परिसरासह अंबरनाथजवळील शेकडो एकरवरील वृक्षलागवडीस आग लावल्याच्या दुर्दैवी घटना नुकत्याच घडल्या आहेत. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेसह निष्काळजीपणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईस प्रारंभ केल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.या धडक कारवाईस अनुसरून आमच्या टिटवाळा वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामगावकर यांनी कल्याण परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांना २६ नोव्हेंबर रोजी आदेश देऊन दोन दिवसांच्या आत घरे खाली करण्याची नोटीस बचावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी वाघेरे यांनी तीन अधिकारी, वीस एसआरपी व २५० कर्मचारी, चार जेसीबी व एक पोकलेन असा भलामोठा फौज फाटा घेऊन उंभार्ली येथील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.या कारवाईमुळे संबंधित कुटूंबांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढवला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यातील सर्वच वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई करून त्या खुल्या करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. मुरबाडचे सहायक वनसंरक्षक हिरवे, भामरे, कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईमुळे वनक्षेत्रात वणवा पेटवण्याच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविली जातेय.>वन विभागाच्या २८ ए या संरक्षित जागेवरील अतिक्र मण केलेली ३७४ बांधकामे पाडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन दिवसांपासून शीळफाटाजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे, शेड्स आदी जमीनदोस्त करण्यात आली. याप्रमाणेच शुक्रवारी उंभार्ली परिसरातही धडक कारवाई केली. यासाठी पोलीस फौजफाटा तसेच शंभरावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले. यामध्ये चाळी, दुकाने, शेड्स यांचा समावेश आहे. यावेळी सुमारे तीन हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.