शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:07 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली.

ठाणे / टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली. कल्याण परिसरासह अंबरनाथजवळील शेकडो एकरवरील वृक्षलागवडीस आग लावल्याच्या दुर्दैवी घटना नुकत्याच घडल्या आहेत. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेसह निष्काळजीपणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईस प्रारंभ केल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.या धडक कारवाईस अनुसरून आमच्या टिटवाळा वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामगावकर यांनी कल्याण परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांना २६ नोव्हेंबर रोजी आदेश देऊन दोन दिवसांच्या आत घरे खाली करण्याची नोटीस बचावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी वाघेरे यांनी तीन अधिकारी, वीस एसआरपी व २५० कर्मचारी, चार जेसीबी व एक पोकलेन असा भलामोठा फौज फाटा घेऊन उंभार्ली येथील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.या कारवाईमुळे संबंधित कुटूंबांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढवला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यातील सर्वच वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई करून त्या खुल्या करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. मुरबाडचे सहायक वनसंरक्षक हिरवे, भामरे, कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईमुळे वनक्षेत्रात वणवा पेटवण्याच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविली जातेय.>वन विभागाच्या २८ ए या संरक्षित जागेवरील अतिक्र मण केलेली ३७४ बांधकामे पाडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन दिवसांपासून शीळफाटाजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे, शेड्स आदी जमीनदोस्त करण्यात आली. याप्रमाणेच शुक्रवारी उंभार्ली परिसरातही धडक कारवाई केली. यासाठी पोलीस फौजफाटा तसेच शंभरावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले. यामध्ये चाळी, दुकाने, शेड्स यांचा समावेश आहे. यावेळी सुमारे तीन हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.