शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई, भिवंडीत दोन महिलांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:29 IST

बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे - बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चार बांगलादेशी घुसखोर महिलांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ मार्च रोजी कारवाई करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणिमहिला कर्मचाºयांच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकून रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना अटक केली होती.नजमा कबीर शेख हिने आठ वर्षांपूर्वी, तर उर्वरित तीन महिलांनी साधारणत: सहा ते आठ महिन्यांपूर्वी घुसखोरी केली. चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्यासाठी संगीता शेठाणी आणि सामसू शेठाणी यांनी या चारही महिलांना बेकायदेशीररीत्या आश्रय दिला होता. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आश्रयदात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी महिला फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रवींद्र दौंडकर यांनी दिली.घरमालकांत खळबळअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे घुसखोरांना बेकायदेशीररीत्या थारा देणाºया घरमालकांमध्ये खळबळ उडाली आहे. बांगलादेशातून घुसखोरी केलेले नागरिक मुख्यत्वे भिवंडी आणि मुंब्रा परिसरात वास्तव्य करतात. या घुसखोरांसोबतच त्यांना आश्रय देणाºयांविरुद्धही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.परदेशी नागरिकास भाडेकरू म्हणून ठेवताना जवळच्या पोलीस ठाण्यास तशी सूचना तातडीने द्यावी लागते. तसा नियमच अस्तित्वात आहे. घरमालकांनी कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवताना या नियमाचे महत्त्व समजून घ्यावे. अन्यथा, त्यांनाही अशा प्रकारच्या फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल.- रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, ठाणे

टॅग्स :Crimeगुन्हाbhiwandiभिवंडी