शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रुग्णालय मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई: दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 08:37 IST

मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु रुग्णालयातील मृत्यूचा रेशो हा ४.५ टक्के एवढा आहे. असे असतानाही जे १८ मृत्यू झालेले आहेत, ते मृत्यूच्या रेशोपेक्षा अधिक असल्याने चौकशीसाठी उच्च समिती नेमण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली. 

केसरकर पुढे म्हणाले की, मृत्यू नैसर्गिक झाले असतील, तर त्यांना मदत देता येणार नाही. परंतु यंत्रणेच्या चुकीमुळे मृत्यू झाले असतील, तर त्यांना मदत देता येणे शक्य आहे. चौकशीत यंत्रणांची चूक निदर्शनास आल्यास दोषी असणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

रुग्णालयात ५०० बेडची क्षमता असताना या ठिकाणी सद्य:स्थितीत ५६६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण वाढला, परंतु तिकडे सिव्हिल रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचेही केसरकरांनी सांगितले. रुग्णांची परवड होणार नाही, यादृष्टीने ट्रस्टच्या रुग्णालयांतील बेडची माहिती यापुढे रुग्णांना दिली जाणार असून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनाही सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मृत्यूला सरकारच जबाबदार - खा. विचारे

कोविड  काळात कसलीच कमतरता नव्हती, मात्र आता लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे, अशी टीका ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे. या १८ जणांच्या मृत्यूची  सर्वस्वी जबाबदारी सरकारची असल्याचेही ते म्हणाले.

जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकर

शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती व इतर सामग्रीसाठी  पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :kalwaकळवाDeepak Kesarkarदीपक केसरकर