शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

उल्हासनगरात 'फी'चा तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई, प्रशासन अधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:36 IST

उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या ६ हजार झाली असून कोरोनाच्या संसर्ग भीतीने राज्य शासनाने शाळा बंद ठेवल्या आहेत.

उल्हासनगर : शालेय 'फी'साठी पालक व मुलांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे संकेत पत्राद्वारे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एम मोहिते यांनी दिले आहेत. शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळांच्या तक्रारी आल्यानंतर मनसे विद्यार्थी संघटनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली. 

उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या ६ हजार झाली असून कोरोनाच्या संसर्ग भीतीने राज्य शासनाने शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळांनी इयत्ता ७ ते १० वीचे ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरू केले. दरम्यान त्यापैकी काही शाळांनी मुलांना व पालकांना मेसेज करून शिक्षकांचा पगार व इतर शाळा खर्च भागविण्यासाठी दरमहा शालेय फी भरा, असे एसएमएसद्वारे सुचविले आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे ते शालेय फी अदा करू शकत नाही. तसेच राज्य शासनाने आदेश काढून शाळांनी फीसाठी मुले व पालकांकडे तगादा लावू नका, असे बजावून कारवाईचे संकेत दिले. 

मनसे विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांच्याकडे शालेय 'फी'साठी तगादा लावल्याचा शाळेच्या असंख्य तक्रारी मुले व पालकांच्या आल्या आहेत. त्यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एम मोहिते यांची भेट घेवून शहरातील शाळांची भयाण परिस्थिती कथन केली. तसेच शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. मोहिते यांनी शहरातील अनुदानित, विनाअनुदान शाळांना पत्र पाठवून शालेय 'फी'साठी तगादा लावणाऱ्या शाळेवर कारवाई का करू नये. असे पत्र बजाविली आहे. प्रशासन अधिकाऱ्याच्या पत्राने शाळा संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरSchoolशाळा