शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:46 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई सुरू आहे पण कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर आयुक्त पी. वेलरासू यांनी यापुढे पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई उघडणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. संयुक्त कारवाईला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने पालिकेच्या पथकांकडूनच कारवाई सुरू आहे. सायंकाळी होणारी दोन तासाची कारवाई वगळता उरलेला काळ रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र सर्रास आहे.ही कारवाई केवळ टोपलीधारक आणि दुकानांबाहेर ठेले लावणाºया फेरीवाल्यांवर होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांंकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे. पावसाळयात उघड्यावर खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी असताना डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक उर्सेकरवाडीत, उद्यानांच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमाने सुरू आहेत. त्याच भागात फेरीवाल्यांवर कारवाई होत असताना या गाड्यांंकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेची कोणतीहीह काळजी न घेता भर गर्दीत उघड्यावर सिलिंडर ठेवून, शेगड्या ठेवून खाद्यपदार्थ शिजवून विकण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच चित्र कल्याणमध्येही आहे.डोंबिवलीत एका फेरीवाल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचाºयांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकारही नुकताच घडला. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांत हे धाडस येते कोठून, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.स्वच्छतेनंतरही कचरा-अतिक्रमण जैसे थेरेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर दर १५ दिवसांनी स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्याने बुधवारी मध्यरात्री स्वच्छता होताच दुसºया दिवशीच स्कायवॉकवर जागोजागी कचºयाचे ढीग साठले. त्यात फेरीवाल्यांचे बस्तान कायम राहिल्याने आयुक्तांचा आदेश कठोर कारवाईअभावी कागदावरच राहिला आहे.या सफाईत अग्निशमन विभागाचाही समावेश आयुक्तांनी केला होता, पण त्याला भारतीय कामगार सेनेने विरोध करत सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगारांकडून स्कायवॉकची स्वच्छता करून घेण्यात आली. बुधवारी रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत स्कायवॉकचा परिसर स्वच्छ केला.या स्वच्छ स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पुन्हा कचºयाचे साम्राज्य, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसले. तेथे गर्दुल्ल्यांचा वावरही कायम असल्याचे आढळले. मद्याच्या बाटल्यांमुळे स्कायवॉक दारूडयांचा अड्डा झाल्याचेही समोर आले.