शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:46 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई सुरू आहे पण कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर आयुक्त पी. वेलरासू यांनी यापुढे पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई उघडणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. संयुक्त कारवाईला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने पालिकेच्या पथकांकडूनच कारवाई सुरू आहे. सायंकाळी होणारी दोन तासाची कारवाई वगळता उरलेला काळ रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र सर्रास आहे.ही कारवाई केवळ टोपलीधारक आणि दुकानांबाहेर ठेले लावणाºया फेरीवाल्यांवर होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांंकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे. पावसाळयात उघड्यावर खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी असताना डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक उर्सेकरवाडीत, उद्यानांच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमाने सुरू आहेत. त्याच भागात फेरीवाल्यांवर कारवाई होत असताना या गाड्यांंकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेची कोणतीहीह काळजी न घेता भर गर्दीत उघड्यावर सिलिंडर ठेवून, शेगड्या ठेवून खाद्यपदार्थ शिजवून विकण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच चित्र कल्याणमध्येही आहे.डोंबिवलीत एका फेरीवाल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचाºयांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकारही नुकताच घडला. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांत हे धाडस येते कोठून, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.स्वच्छतेनंतरही कचरा-अतिक्रमण जैसे थेरेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर दर १५ दिवसांनी स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्याने बुधवारी मध्यरात्री स्वच्छता होताच दुसºया दिवशीच स्कायवॉकवर जागोजागी कचºयाचे ढीग साठले. त्यात फेरीवाल्यांचे बस्तान कायम राहिल्याने आयुक्तांचा आदेश कठोर कारवाईअभावी कागदावरच राहिला आहे.या सफाईत अग्निशमन विभागाचाही समावेश आयुक्तांनी केला होता, पण त्याला भारतीय कामगार सेनेने विरोध करत सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगारांकडून स्कायवॉकची स्वच्छता करून घेण्यात आली. बुधवारी रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत स्कायवॉकचा परिसर स्वच्छ केला.या स्वच्छ स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पुन्हा कचºयाचे साम्राज्य, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसले. तेथे गर्दुल्ल्यांचा वावरही कायम असल्याचे आढळले. मद्याच्या बाटल्यांमुळे स्कायवॉक दारूडयांचा अड्डा झाल्याचेही समोर आले.