शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे, पण कुठे? खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:46 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू असल्याचा दावा केडीएमसी प्रशासनाकडून केला जात असला, तरी सायंकाळी होणारी थातुरमातूर कारवाई केवळ टोपलीधारक फेरीवाल्यांवरच होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे कारवाई सुरू आहे पण कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर आयुक्त पी. वेलरासू यांनी यापुढे पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई उघडणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. संयुक्त कारवाईला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने पालिकेच्या पथकांकडूनच कारवाई सुरू आहे. सायंकाळी होणारी दोन तासाची कारवाई वगळता उरलेला काळ रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र सर्रास आहे.ही कारवाई केवळ टोपलीधारक आणि दुकानांबाहेर ठेले लावणाºया फेरीवाल्यांवर होत असून खाद्यपदार्थांच्या गाड्यांंकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे. पावसाळयात उघड्यावर खाद्यपदार्थांच्या विक्रीला बंदी असताना डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक उर्सेकरवाडीत, उद्यानांच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्या जोमाने सुरू आहेत. त्याच भागात फेरीवाल्यांवर कारवाई होत असताना या गाड्यांंकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेची कोणतीहीह काळजी न घेता भर गर्दीत उघड्यावर सिलिंडर ठेवून, शेगड्या ठेवून खाद्यपदार्थ शिजवून विकण्याचे प्रकार सुरू आहेत. असेच चित्र कल्याणमध्येही आहे.डोंबिवलीत एका फेरीवाल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचाºयांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकारही नुकताच घडला. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांत हे धाडस येते कोठून, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.स्वच्छतेनंतरही कचरा-अतिक्रमण जैसे थेरेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर दर १५ दिवसांनी स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्याने बुधवारी मध्यरात्री स्वच्छता होताच दुसºया दिवशीच स्कायवॉकवर जागोजागी कचºयाचे ढीग साठले. त्यात फेरीवाल्यांचे बस्तान कायम राहिल्याने आयुक्तांचा आदेश कठोर कारवाईअभावी कागदावरच राहिला आहे.या सफाईत अग्निशमन विभागाचाही समावेश आयुक्तांनी केला होता, पण त्याला भारतीय कामगार सेनेने विरोध करत सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सफाई कामगारांकडून स्कायवॉकची स्वच्छता करून घेण्यात आली. बुधवारी रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत स्कायवॉकचा परिसर स्वच्छ केला.या स्वच्छ स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पुन्हा कचºयाचे साम्राज्य, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसले. तेथे गर्दुल्ल्यांचा वावरही कायम असल्याचे आढळले. मद्याच्या बाटल्यांमुळे स्कायवॉक दारूडयांचा अड्डा झाल्याचेही समोर आले.