शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पत्नीशी झालेल्या भांडणातून विनयभंगातील आरोपीची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: December 4, 2018 22:52 IST

ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा ...

ठळक मुद्दे२५ व्या मजल्यावरुन घेतली उडीकार्पोेरेट कंपनीत होता उच्च पदस्थ अधिकारीकंपनीतून कारवाईचीही होती भीती

ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (३८, रा. लोढा अमारा, कोलशेत, ठाणे) याने २५ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे पोलिसांनी सुपूर्द केला.विवाहित असलेल्या अभिशेषकुमारचे आपल्याच कार्यालयातील सहकारी महिलेशी मैत्रीचे संबंध होते. त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आणि ‘अपेक्षे’मुळे या महिलेने त्याच्याशी मैत्री तोडली होती. तिने पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्याशी मैत्रिचे संबंध ठेवावेत, यासाठी त्याचा आग्रह होता. त्यासाठी तो तिला वेगवेगळया मोबाइलवरून फोन करीत होता. तिच्या मेल आयडी आणि व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज करुन तिच्यासह तिचे पती, आई, सासू, सासरे, नणंद आदींना त्याने शिवीगाळही केली. तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिची आणि तिच्या कुटूंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी त्याला अटकही झाली होती. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एककडे सोपविण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सोमवारी ३ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याची सायंकाळी ५ वा. च्या सुमारास जामीनावर सुटका केली. त्याला अटक झाली त्यावेळी (२८ नोव्हेंबर रोजी) त्याची पत्नी पोर्णिमा (३०) हिला त्याचे बाहेरील हे प्रकरण समजले. त्यामुळे ती संतापलेली होती. सोमवारी सायंकाळी तो जामीनावर सुटल्यानंतर मात्र तिने या प्रकाराचा जाब विचारुन त्याला फैलावर घेतले. त्याच्या आईवडिलांसमोरच तिने चांगलाच पानउतारा करून त्याच्याशी कडाक्याचे भांडण केले. तिचा संयम सुटल्यानंतर तिने यातूनच त्याला मारहाणही केली. आधी पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीने केलेल्या विनयभंगाच्या गुन्हयात झालेली अटक त्यानंतर पत्नीने आईवडिलांसमोरच जाब विचारत केलेले भांडण यातून व्यथित होऊन आपल्याच लोढा- अमारा या इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून अभिशेषकुमारने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कंपनीतून कारवाईचीही होती भीतीरिलायन्ससारख्या बडया कंपनीत मोठया पदावर नोकरीवर असल्याने विनयभंगासारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कंपनीतूनही कारवाईची टांगती तलवार अभिशेषकुमारवर होती. याच दडपणाखाली तो असतांना सोमवारी पती पत्नींमधील वादाचीही त्यात भर पडली. यातून पूर्णपणे कोसळल्यामुळे त्याने घरातून बाहेर येत घराच्या समोरील लॉबीच्या खिडकीतून स्वत:ला झोकून दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या