शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाची आम्हालाही प्रतिक्षा; सर्वोच्च सुनावणीवर बोलले श्रीकांत शिंदे

By अजित मांडके | Updated: October 13, 2023 14:52 IST

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाणे : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. त्यांना देखील विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे. मात्र, न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष हे आता लवकरच शेड्युल देतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. निवडणुक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही देखील आता अध्यक्षांकडून निर्णयाची वाट बघत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. यापूर्वी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे विचार देत होते. याच विचारांचे सोने लुटण्यासाठी सर्वजण एकत्र येत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून कॉंग्रेसला गाढण्याचे विचार दिले होते. परंतु आता हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून, केवळ कॉंग्रेस कशी वाढेल यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  त्यामुळेच उध्दव ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत.  परंतु हिंदुत्वाचे  आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील दिड वर्षापासून राज्य सरकाराने सर्वच निर्बंध दूर केले आहेत, त्यामुळेच सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या बाबत त्यांनी छेडले असता, काही लोकांवर बोलायला मला आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नरेश म्हस्के यांनी संजय राऊत हे भंगार मनोवृत्तीचे असल्याचा पुर्नउच्चार केला. तसेच त्यांनी पक्षाला भंगारात नेण्याचे काम केले आहे. उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाºयांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोदामात भंगार बनून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुण्यात शिवसेनेच्या वतीने ड्रग्ज माफीयाच्या विरोधात कारवाई व्हावी या उद्देशाने मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यावर म्हस्के यांनी छेडले असता, केवळ सहानभुती मिळविण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ज्या ड्रग्ज माफीयाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे, त्याच्या सोबत उध्दव ठाकरे यांचे फोटो आहेत, त्याला पक्षात घ्यावे म्हणून कोणी दबाव आणला होता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShrikant Shindeश्रीकांत शिंदे