शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

स्वीकृतसाठी शिवसेनेचा निष्ठावंतांना न्याय

By admin | Updated: April 16, 2017 04:28 IST

ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे. महापौरपद निष्ठावान शिवसैनिकाला दिल्यानंतर आता पुन्हा स्वीकृतपदासाठीदेखील तिघा निष्ठावंतांना संधी दिली आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे शहराध्यक्ष संदीप लेले आणि राष्ट्रवादीकडून मनोहर साळवी यांनी शनिवारी महापालिकेकडे गटनेत्यांचे पत्र सादर केले. या पाच जणांची निवड येत्या २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपाचे २३, काँग्रेस ३, एमआयएम २, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. त्यानुसार, आता मागच्या दाराने प्रवेश करण्यासाठी शिवसेनेकडून तिघे, तर राष्ट्रवादी व भाजपाकडून एक जण पालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे पुन्हा निष्ठावंतांना न्याय दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले कळव्यातील राजेंद्र साप्ते, वागळे पट्ट्यातील दशरथ पालांडे आणि शहरप्रमुख रमेश वैती यांचे पुत्र जयेश वैती यांना संधी दिली आहे. सुरुवातीपासून वैती आणि राजेंद्र यांची नावे अंतिम मानली जात होती. परंतु, तिसऱ्या नावावरून बऱ्याच जणांनी श्रेष्ठींकडे तगादा लावला होता. अखेर, श्रेष्ठींनी तिसऱ्या जागीदेखील निष्ठावान शिवसैनिकालाच संधी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतून सुरुवातीला अमित सरय्या यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, त्यांचे नाव पिछाडीवर पडल्यानंतर कळव्यातून मनोहर साळवी यांनी शनिवारी स्वीकृतसाठी अर्ज सादर केला. दुसरीकडे भाजपामधूनदेखील एकमेव शहराध्यक्ष संदीप लेले यांच्याच नावाची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. त्यांच्या नावाला त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध केला असून त्यांच्याविरोधात सह्यांची मोहीम घेऊन त्यांना हे पद मिळू नये, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. (प्रतिनिधी) अंतर्गत वाद चव्हाट्यावरपक्षाने दुसऱ्या गटाची ही मोहीम मोडीत काढून अपेक्षेप्रमाणे लेले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार, या सर्वांची निवड २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे. लेले यांच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येणार असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.