शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

विनापरमिट धावताहेत साडेचार हजार रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:23 AM

ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे.

ठाणे : ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच येत्या सोमवारपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील नोंदणी केलेल्या रिक्षांची काटेकोरपणे तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ सूत्रांनी सांगितले.ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नोंदणी केलेल्या आॅटोरिक्षांना ‘मे’ महिन्यात एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेनुसार १० हजार रिक्षांना नंबरवाटप केले आहे. यावेळी आॅटोरिक्षाधारकांनी ठाणे कार्यालयाकडे रिक्षापरवाना घेण्यासाठी अर्जाद्वारे त्याचे इरादापत्र प्राप्त करून त्याआधारे वाहनाची नोंदणी करून घेतलेली आहे. मात्र, कार्यालयीन तपासणीत १० हजार नोंदणी झालेल्या आॅटोरिक्षांपैकी साडेपाच हजार रिक्षाचालकांनी परमिट घेतले असून उर्वरित साडेचार हजार रिक्षाचालकांनी कागदपत्रे (पक्का परवाना, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र) परिपूर्ण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील सर्व रिक्षा परवानाधारक-मालकांनी त्यांच्या रिक्षाच्या कागदपत्रांची ठाणे आरटीओ कार्यालयात पूर्तता करून घ्यावी व मूळ वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे.दरम्यान, आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत ९ जुलैपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेमधील नोंदणी केलेल्या रिक्षांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी वैध कागदपत्रे सोबत न बाळगणाºया रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच काही रिक्षाचालकांनी १५ हजारांचे डीडी कार्यालयात जमा केले आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रिया झाल्याने ते डीडी आरटीओ विभागाला भरता येत नाहीत. ते त्या रिक्षाचालकांनी परत नेण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. त्याला १५-२० दिवस झाल्यानंतर अद्यापही कोणी आलेले नाही.- तपासणी मोहिमेसाठी चार वायुवेग पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात दोन जण असणार असून ते ठाणे-भिवंडी-भार्इंदर परिसरात तपासणी करणार आहे. सर्वाधिक रिक्षा भिवंडी-भार्इंदर या परिसरात धावत आहेत. या तपासणीत वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्या रिक्षाचालकांकडून मोटार वाहन कायद्यांतर्गत चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे