शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

प्रचारासाठी लवकरच होणार ‘मैदान ए जंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:32 AM

अंतिम टप्प्यात धुरळा; मैदाने आरक्षणासाठी लागणार चढाओढ

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. सध्या उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राजकीय पक्ष मेळावे आणि बैठकांनाही प्राधान्य देत आहेत. उमेदवार आणि रणनीती ठरल्यानंतर प्रचारसभांसाठी मैदाने मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.लोकसभेच्या कल्याण आणि भिवंडी मतदारसंघांत कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिसर येतो. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा, पूर्वेतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल तर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान, मॅक्सी ग्राउंड (यशवंतराव चव्हाण क्रीडांगण), फडके मैदान तसेच पूर्वेकडे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण अशी मोठी मैदाने प्रचारासाठी आहेत. यातील सुभाष मैदान आणि मॅक्सी ग्राउंड ही मैदाने विशिष्ठ ठरावान्वये फक्त खेळासाठीच राखीव आहेत. अपवाद म्हणून राष्ट्रीय व्यक्तींच्या सभांसाठी ही मैदाने देण्याबाबत केडीएमसी निर्णय घेणार आहे.कल्याण आणि भिवंडी मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठ्या सभा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहणार आहे. २ एप्रिलनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी करणे, माघार घेणे, उमेदवारांची यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पार पडेल.साधारण मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मैदान आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू होण्याची शक्यता आहे. कल्याण मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथमधील नेताजी मार्केट ग्राउंड, गावदेवी मैदान तर उल्हासनगरमधील गोल मैदान, व्हिटीसी ग्राउंड आणि दसरा मैदान ही मैदानेही प्रचार सभांसाठी सज्ज आहेत. परंतु, ती आरक्षित करण्यासंदर्भातही एकही अर्ज अद्यापपर्यंत आलेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील मैदानांसंदर्भात केडीएमसीचे मालमत्ता व्यवस्थापक प्रकाश ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मैदान राखीव करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाचा अर्ज आलेला नसल्याची माहिती दिली.प्राधान्यक्रम ठरवणारमैदाने आरक्षित करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळेल. परंतु, मैदानासाठी ज्याचा अर्ज पहिला येईल त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे. रोस्टर पद्धतीने मैदाने प्रचार सभांसाठी उपलब्ध होणार आहेत.मेळावे, बैठकांवर भरसध्या मेळावे आणि बैठका घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. राष्ट्रवादीतर्फे बुधवारी कल्याण पूर्वेत मेळावा होत आहे. अशा मेळाव्यांसाठी प्रामुख्याने मोठी सभागृहे घेतली जातात.कल्याण-डोंबिवलीत साधारण १० ते १२ मोठी सभागृहे आहेत. त्यामुळे सध्या ही सभागृहे आरक्षित करण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहील.मार्च, एप्रिल हा लग्न सराईचा कालावधी पाहता सभागृहांची उपलब्धता हा देखील कळीचा मुद्दा राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक