शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे; आदिवासी तरुण बनला पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:07 IST

नोकरी करत जिद्दीने पूर्ण केले शिक्षण

मुरबाड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत (पीएसआय) मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासीवस्तीतील जयवंत रामा वारा यांनी एसटी प्रवर्गात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तालुक्यातील आदिवासीबांधवांसह सर्वांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जयवंत वारा यांच्याकडे अठराविश्वे दारिद्र्य. वडील गावात शेती करण्यासोबतच मोलमजुरी करुन मिळालेल्या पैशांतून कुटुंब चालवत असत. मुलांना शिकवण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने जयवंत यांना त्यांच्या वडिलांनी पहिलीपासून सासणे (कान्होळ) येथील शासकीय आश्रमशाळेत दाखल केले. तेथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा, खुटल (बारागाव) येथे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आदिवासी वसतिगृहात राहून पूर्ण केले.आईवडील निरक्षर, तसेच घरची हलाखीची परिस्थिती यामुळे जयवंत यांनी गावाजवळच असलेल्या फार्महाउसवर मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी कुटुंबास हातभार लावण्यास सुरुवात केली. तसेच स्वत:चे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.पदवी घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवली. ही नोकरी करताकरताच त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती झाली आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही.नोकरी सांभाळत पुन्हा त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.जुलै २०१८ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.या परीक्षेत अनुसूचित जमातीच्या पुरु ष गटात चोेविसावा क्रमांक मिळवत त्यांनी घवघवीत यश संपादन केले.आदिवासी तरु णांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.तसेच मेहनत करून समाजात नवा आदर्श निर्माण करावा.आपल्या मदतीला कोणी येईल, यासाठी न थांबता स्वत:च स्वत:चे भविष्य घडवून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा असे जयवंत वारा यांनी लोकमतला सांगितले.