शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे; आदिवासी तरुण बनला पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:07 IST

नोकरी करत जिद्दीने पूर्ण केले शिक्षण

मुरबाड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत (पीएसआय) मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासीवस्तीतील जयवंत रामा वारा यांनी एसटी प्रवर्गात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तालुक्यातील आदिवासीबांधवांसह सर्वांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जयवंत वारा यांच्याकडे अठराविश्वे दारिद्र्य. वडील गावात शेती करण्यासोबतच मोलमजुरी करुन मिळालेल्या पैशांतून कुटुंब चालवत असत. मुलांना शिकवण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने जयवंत यांना त्यांच्या वडिलांनी पहिलीपासून सासणे (कान्होळ) येथील शासकीय आश्रमशाळेत दाखल केले. तेथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा, खुटल (बारागाव) येथे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आदिवासी वसतिगृहात राहून पूर्ण केले.आईवडील निरक्षर, तसेच घरची हलाखीची परिस्थिती यामुळे जयवंत यांनी गावाजवळच असलेल्या फार्महाउसवर मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी कुटुंबास हातभार लावण्यास सुरुवात केली. तसेच स्वत:चे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.पदवी घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवली. ही नोकरी करताकरताच त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती झाली आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही.नोकरी सांभाळत पुन्हा त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.जुलै २०१८ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.या परीक्षेत अनुसूचित जमातीच्या पुरु ष गटात चोेविसावा क्रमांक मिळवत त्यांनी घवघवीत यश संपादन केले.आदिवासी तरु णांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.तसेच मेहनत करून समाजात नवा आदर्श निर्माण करावा.आपल्या मदतीला कोणी येईल, यासाठी न थांबता स्वत:च स्वत:चे भविष्य घडवून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा असे जयवंत वारा यांनी लोकमतला सांगितले.