शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बहिणीला मेसेज पाठविल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला, नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: May 13, 2024 23:18 IST

याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाणे : बहिणीला मेसेज पाठविल्याच्या संशयातून ऋषिकेश चाचरे (२५, रा. पाचपाखाडी, ठाणे) याच्यावर २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार केल्याची घटना घडली. यात मध्यस्थी करणाऱ्या ऋषिकेश याच्या मैत्रिणीच्या उजव्या हातावर वार करून तिलाही गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.ठाण्यातील पाचपाखाडी भागातील आनंद सावली गृहसंकुलातील त्याच्या घरी ११ मे २०२४ रोजी ऋषिकेश सायंकाळी ४:३० वाजता त्याच्या मैत्रिणींसह होता. त्याचदरम्यान प्रणील पवार (२०, नावात बदल) आणि गणेश शेट्टी (२५, रा. सावरकरनगर, ठाणे) हे दोघेही त्याच्या घरी गेले. यातील प्रणीलने बहिणीला मेसेज पाठवतो, याचा राग मनात धरून शिवीगाळ करीत गणेशने त्याचे दोन्ही हात समोरून पकडले. त्यानंतर प्रणीलने त्याच्याकडील चाकूने त्याच्या बगलेखाली तसेच, पाठीवर खुपसून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या प्रणीलच्या मैत्रिणीने यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.प्रणीलने त्याच्याकडील चाकूने तिच्याही उजव्या हातावर गंभीर दुखापत करून तिला जखमी केले. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही हल्लेखोर तिथून फरार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला त्याच्या मैत्रिणीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस