शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ५० ते ६० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

By नितीन पंडित | Updated: April 29, 2023 17:43 IST

घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील कैलास नगर वर्धमान कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली ५० ते ६० नागरिक अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत खाली वाणिज्य वापराचे गाळे व वरती नागरिक राहत होते. घटनास्थळी अग्निशमन दल रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

 

मिळालेली माहिती अशी, इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत नऊ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास भिवंडीतील वालपाडा येथील वर्धमान भवन नावाची तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीखाली गोदामही होते.

इमारतीच्या वरच्या तीन मजल्यावर लोक राहत होते. घटनेच्या वेळी या गोडाऊनमध्ये ३० ते ३५ जण काम करत होते. दुपारी अचानक इमारत कोसळल्याने कामगारांसह इमारतीत राहणारे एकूण ७० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह मदत व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि अतिशय काळजीपूर्वक ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. इमारतीच्या गोदामात काम करणाऱ्या एका मजुराने माध्यमांना सांगितले की, आमच्यापैकी काहीजण जेवणासाठी गोडाऊनमध्ये थांबले होते. त्यानंतर अचानक इमारत कोसळल्याचा आवाज आला आणि आम्ही गोदामातून धावत सुटलो त्यामुळे आम्ही वाचलो, तर आमचे अनेक सहकारी मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

१) सोनाली परमेश्वर कांबळे -वय-२२ वर्ष, २) शिवकुमार कांबळे वय २६ वर्ष ३) मुक्तार रोशन मंसुरी वय २६ वर्ष ४) चिकू रोहित सिंग वय - ५ वर्ष, ५) प्रिन्स रोहित सिंग व ३ वर्ष ६) विकासकुमार मुकेश रावय - १८ वर्ष ७) उदयभान मुनिराम यादव- वय २५ वर्ष ८) अनिता वय ३० वर्ष यांची सुखरूप सुटका केलेली आहे त्यात अनुक्रमांक ३ ते ८ यांस उपचारा कामी IGM हॉस्पीटल भिवंडी येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच १) नवनाथ सावंत वय ३५ वर्ष हे मयत झालेले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडी