शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

By नितीन पंडित | Updated: July 5, 2024 11:53 IST

शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते.

भिवंडी: शहरात एका नराधमाने नऊ वर्षाच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते. वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात काम करत होती. आई आपल्या दोन्ही मोठ्या मुलींना सुध्दा सोबत कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. गुरुवारी सुध्दा हे कुटुंब नेहमी प्रमाणे कामाला गेले तर मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्यासुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने पीडित चिमुरडीस खाऊचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले.

मुलीने आपली खोली कुलूप लाऊन बंद केली व ती त्या नराधमाच्या खोलीत गेल्यावर तेथे नराधमाने तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केली.सायंकाळी शाळेतून भाऊ घरी आला ,खोलीला कुलूप बघून त्याने बहिणीला शोधले पण ती सापडली नाही. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला वरच्या मजल्या वरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता बाहेरून कडी लावलेल्या एका खोलीत पीडितेचा मृतदेह  रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आला.हे दृश्य पाहिल्यावर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचा फौजफाटा परिसरात दाखल होत त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात रवाना केला.पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह शास्त्रोक्त उत्तरीय तपासणी साठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठवला आहे. तर पोलिस सूत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे