शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आंघाेळीला गरम पाणी देण्यावरुन झालेल्या वादातून पतीचा पत्नीवर सुरीने खूनी हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: February 5, 2024 20:54 IST

पतीला अटक : कोपरी पोलिसांची कारवाई

ठाणे: आंघाेळीला गरम पाणी ठेव आणि माळयावरुन तेलाचा डबा काढून द्या, असे पत्नी कुसूम मालुसरे (२७) हिने पती ज्ञानेश्वर मालुसरे (३७) यांना सांगितले. आपल्याला काम सांगितल्याचा राग आल्याने त्याने तिला शिवीगाळी केली. त्यावर शिवीगाळी करु नको, असे बजावणाऱ्या पत्नीच्या गळयावरच चाकूने वार करीत तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी कोपरीमध्ये घडली. याप्रकरणी पती ज्ञानेश्वर याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील आनंदनगर परिसरातील रहिवाशी ज्ञानेश्वर याचा ४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाला होता. पत्नीने माळयावरुन तेलाचा डबा काढून द्या आणि आंघाेळीसाठी गरम पाणी ठेवा, असे त्याला काम सांगितले. हे काम सांगितल्यामुळे हा वाद विकोपाला गेला. यातूनच ज्ञानेश्वर याने पत्नीचे तोंड दाबून गळयावर सुरीने वार करुन तिला ढकलून दिले. घराचा दरवाजाही बंद केला.

त्यानंतर तिच्या छातीच्या खाली पोटावर डाव्या बाजूलाही त्याने सुरीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर लादीवर सांडलेले रक्त बारदाणाने पुसून लादीही त्याने साफ केली. रक्ताने माखलेले बारदाण, तिचे कपडे आणि सुरी त्याने आनंदनगर येथील नाल्यामध्ये फेकून देत पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे ‘पोलिसांमध्ये तक्रार देऊ नकोस, नाहीतर तुला मारुन टाकीन, जिवंत सोडणार नाही’, असा दमही तिला भरला. या घटनेनंतर कुसूम हिला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय नलावडे हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे