शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर

By संदीप प्रधान | Updated: April 11, 2024 09:00 IST

मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरण्यामुळे मनसेच्या मतांना ओहोटी लागल्याचीही येथील मनसैनिकांची भावना आहे.

संदीप प्रधान

ठाणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी भविष्यात होणाऱ्या ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाचे प्रत्येक मतदारसंघात किमान अर्धा डझन इच्छुक असताना मनसेची डाळ कशी शिजणार, याची चिंता कार्यकर्त्यांना वाटत आहे. मराठी बहुल शहरांत २००९ च्या निवडणुकीत मनसेला. लाखा लाखांची मते देणारा मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाची कास धरण्यामुळे मनसेच्या मतांना ओहोटी लागल्याचीही येथील मनसैनिकांची भावना आहे

मनसे स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार राजन राजे यांना एक लाख ३४ हजार ८४० मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात मोदी लाट असल्याने मनसेची मते घटली व ठाण्यात अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली. कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेच्या वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही मनसेच्या राजू पाटील यांना कल्याण मतदारसंघात एक लाख २२ हजार मते मिळाली होती. मोदींच्या उदयानंतर मनसेनेही हिंदुत्वाची भूमिका घेतली. परंतु मोदींसारखा हिंदुत्ववादी नेता समोर असताना मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दा फिका पडला. त्यापेक्षा ठाणे, कल्याण भागात मराठीच्या मुद्द्याचा आग्रह ठेवला असता तर अधिक फायदा झाला असता, असे मनसैनिकांना वाटते.

२०१९ व आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता मोदी विरुद्ध किंवा मोदींच्या पाठिंब्याकरिता केवळ प्रचार करण्यामुळे पक्षाची हानी होणार असल्याची मनसैनिकांची भावना आहे. तब्बल दहा वर्षे लोकसभा निवडणूक न लढण्यामुळे मनसे परीक्षा न देता त्याच वर्गात बसल्यासारखी स्थिती असल्याचे मनसैनिकांचे मत आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक