शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

भिवंडीतील व्यावसायिकाने गुंतवणूकदारांची केली १७५ कोटींची फसवणूक

By नितीन पंडित | Updated: December 1, 2023 17:34 IST

व्यवसायिकाची मालमत्ता जप्त करण्याचे गृह विभागाने आदेश,तर व्याजासह पैसे परत मिळण्याची गुंतवणूक दारांची मागणी

भिवंडी: भिवंडीतील ग्रामीण भागात नवीन ठाणे बनवणार असून या नवीन ठाण्यात नागरिकांना स्वस्त व हक्काची घरे मिळवून देण्याचे अमिष दाखवून सुमारे ४ हजारांहुन अधिक गरीब नागरिकांची तब्बल १७५ कोटी रुपयांहुन अधिकची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी केलेल्या तक्रारी अर्जांची दखल राज्याच्या गृह विभागाने घेत व्यावसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र राज्य शासनाच्या आदेशानंतर ही गुंतवणूकदारांना कोणताही मोबदला अथवा रकमेचा परतावा मिळाला नसल्याने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह लवकरात लवकर परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

भिवंडीतील अंजुर फाटा चिंचोटी महामार्गावर असलेल्या मालोडी,खार्डी, पाये,पायगाव परिसरात नवीन ठाणे बसणार असून या ठिकाणी स्वस्तात घरे मिळणार असल्याचे आमिष महावीर पटवा या बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना २०१२ मध्ये दाखविले होते.विविध ठिकाणी याबाबतच्या जाहिराती महावीर पटवा यांनी केल्या होत्या. या जाहिरातींना भुलून सुमारे ४ हजारहुन अधिक नागरिकांनी या बांधकाम प्रकल्पात पैशांची गुंतवणूक केली होती मात्र महावीर पटवा बांधकाम प्रकल्पाचे व्यवसायिक राजेश पटवा यांनी गृह प्रकल्प अर्धवट सोडून गुंतवणूक दारांचे सुमारे १७५ कोटी रुपये हडप केले.

याबाबत महावीर पटवा बांधकाम व्यावसायिका विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील करण्यात आली होती.यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे व राज्य शासनाकडे देखील तक्रार दाखल केली होती.यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी महावीर पटवा बांधकाम व्यवसायिकाची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार गरीब असल्याने अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी या प्रकल्पासाठी दिली आहे तर अनेकांना घर मिळाले नाही मात्र संपूर्ण हफ्ते भरले आहेत त्यामुळे गुंतवणूकदार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे २०१२ पासून आम्ही भरलेल्या रकमेवर बँकेने व्याज वसूल केला असल्याने आमचे पैसे आम्हाला व्याजासह परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी केली आहे.संदर्भातील लेखी निवेदन देखील गुंतवणूकदारांनी भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात दिले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर ही आयुष्यभराची पुंजी बांधकाम व्यावसायिकाला देऊनही या गुंतवणूकदारांना नागर मिळाले ना हक्काचे पैसे त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पैसे व्याजासह परत मिळावे अशी मागणी या गुंतवणूकदारांनी शासनाकडे केली आहे.

भिवंडी महावीर पटवा प्रकल्पातील गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया-

२०१३-१४ साली मी या प्रकल्पात तीन रूमचे घर घेतले होते ज्याचा ताबा २०१६ साली बांधकाम व्यवसायिक देणार होता यासाठी नऊ लाख रुपये रोखीने भरले होते मात्र अजूनही आम्हाला ना घर मिळाले ना आमचा पैसा अशी प्रतिक्रिया गुंतवणूकदार नितीन मोहिते यांनी दिली आहे.

२०१४ साली आम्ही दोन रूमचे घर या प्रकल्पात घेतले होते त्यासाठी दहा लाख रुपये भरले आहेत. या घराचा ताबा बांधकाम व्यवसायिक आम्हाला २०१९ रोजी देणार होता मात्र आजपर्यंत आम्हाला काहीच मिळाले नाही अशी प्रतिक्रिया ठाणे येथील रहिवासी  व गुंतवणूकदार राजेंद्र पराडकर यांनी दिली आहे.

मी इन्शुरन्स कंपनीत कामाला असून २०१२ मध्ये या प्रकल्पात वन बीएचके घर घेतले होते, ज्याचा ताबा २०१४ साली मिळणार होता. यासाठी ५ लाख ८० हजार रुपये भरले असून आमच्या घराचे रजिस्ट्रेशन देखील झाले आहे. मात्र अजूनही आम्हाला घर मिळालेले नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र बिडकर यांनी दिली आहे.