शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

ठाणे जिल्ह्यात सोमवारी ९६७ कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:32 IST

कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ९६७ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णसंख्या एक लाख सात हजार ५३३ झाली आहे. तर, ३७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीन हजार ७५ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.सोमवारी १९३ नवे रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या २३ हजार ४८८ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २५० रुग्ण आढळले आहेत. या शहरात आता २४ हजार ६७० बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या ५०३ झाली आहे.नवी मुंबईत २४० रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सोमवारी फक्त चार रुग्ण सापडले आहेत. अंबरनाथ शहरात २१ रुग्ण नव्याने आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. बदलापूरमध्ये ५५ रुग्ण वाढले. यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ४८४ झाले आहेत.>रायगडमध्ये१८५ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या २० हजार ९२५ वर पोहोचली आहे. १७ हजार ५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ७२, पनवेल ग्रामीणमध्ये२० रुग्ण सापडले आहेत. पनवेल महानगरपालिका १७७, पनवेल ग्रामीण ३३, उरण १३, खालापूर १७, कर्जत १०, पेण १७, अलिबाग २२, असे एकूण ३३८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.>वसई-विरारमध्ये११६ रुग्ण कोरोनामुक्तवसई : वसई-विरार शहरात सोमवारी ११६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. यामुळे ११ हजार ९६२ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात ६९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या