शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कोरोना काळात ९४३ आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या. साहजिकच, यातून आलेले नैराश्य आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्येकाची कारणे वेगळी असली तरी, कोरोना काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ९४३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनासारख्या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लॉकडाऊनही करावे लागले. परंतु, याच लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये ६७० आत्महत्यांची नोंद झाली. तसेच २०२० मध्ये लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात हीच संख्या ६९५ च्या घरात गेली, तर जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काळात २४८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. पती-पत्नीचे भांडण, आर्थिक समस्या, कर्जबाजारी होणे, चारित्र्याचा आरोप होणे, तसेच प्रेमप्रकरणात अपयश... अशी अनेक कारणे यामध्ये असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

* कोणत्या वयाचे किती...

आत्महत्या करणाऱ्यांची वयपरत्वे कारणे वेगळी आहेत. यात २० ते २५ वयोगटात अत्यल्प प्रमाण असून २६ ते ४० आणि ४१ ते ६० यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. ६१ पेक्षा जास्त वयोगटात हे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* हे दिवसही जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे. कोरोनाची पहिली आणि दुसरीही लाट संपली. तशीच आलेली वेळ जाणार आहे. सकारात्मकता ठेवली पाहिले. पुढे चांगले होईल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच आत्महत्येचा विचार नक्कीच येणार नाही.

- डॉ. विक्रम वैद्य, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.............................

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज -

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्येही वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. सकारात्मक विचार रुजविल्यास आत्महत्येचा विचार येणार नाही.

- डॉ. संदीप दिवेकर, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.........................

२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या - ६७०

२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या - ६९५

जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या काळात झालेल्या आत्महत्या - २४८

..............................