शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ९४३ आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या. साहजिकच, यातून आलेले नैराश्य आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्येकाची कारणे वेगळी असली तरी, कोरोना काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ९४३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनासारख्या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लॉकडाऊनही करावे लागले. परंतु, याच लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये ६७० आत्महत्यांची नोंद झाली. तसेच २०२० मध्ये लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात हीच संख्या ६९५ च्या घरात गेली, तर जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काळात २४८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. पती-पत्नीचे भांडण, आर्थिक समस्या, कर्जबाजारी होणे, चारित्र्याचा आरोप होणे, तसेच प्रेमप्रकरणात अपयश... अशी अनेक कारणे यामध्ये असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

* कोणत्या वयाचे किती...

आत्महत्या करणाऱ्यांची वयपरत्वे कारणे वेगळी आहेत. यात २० ते २५ वयोगटात अत्यल्प प्रमाण असून २६ ते ४० आणि ४१ ते ६० यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. ६१ पेक्षा जास्त वयोगटात हे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* हे दिवसही जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे. कोरोनाची पहिली आणि दुसरीही लाट संपली. तशीच आलेली वेळ जाणार आहे. सकारात्मकता ठेवली पाहिले. पुढे चांगले होईल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच आत्महत्येचा विचार नक्कीच येणार नाही.

- डॉ. विक्रम वैद्य, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.............................

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज -

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्येही वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. सकारात्मक विचार रुजविल्यास आत्महत्येचा विचार येणार नाही.

- डॉ. संदीप दिवेकर, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.........................

२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या - ६७०

२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या - ६९५

जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या काळात झालेल्या आत्महत्या - २४८

..............................