शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कोरोना काळात ९४३ आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी चांगल्या पगाराच्या अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या. साहजिकच, यातून आलेले नैराश्य आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रत्येकाची कारणे वेगळी असली तरी, कोरोना काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ९४३ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनासारख्या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह लॉकडाऊनही करावे लागले. परंतु, याच लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २०१९ मध्ये ६७० आत्महत्यांची नोंद झाली. तसेच २०२० मध्ये लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात हीच संख्या ६९५ च्या घरात गेली, तर जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काळात २४८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. पती-पत्नीचे भांडण, आर्थिक समस्या, कर्जबाजारी होणे, चारित्र्याचा आरोप होणे, तसेच प्रेमप्रकरणात अपयश... अशी अनेक कारणे यामध्ये असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

* कोणत्या वयाचे किती...

आत्महत्या करणाऱ्यांची वयपरत्वे कारणे वेगळी आहेत. यात २० ते २५ वयोगटात अत्यल्प प्रमाण असून २६ ते ४० आणि ४१ ते ६० यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. ६१ पेक्षा जास्त वयोगटात हे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* हे दिवसही जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे. कोरोनाची पहिली आणि दुसरीही लाट संपली. तशीच आलेली वेळ जाणार आहे. सकारात्मकता ठेवली पाहिले. पुढे चांगले होईल, ही आशा ठेवली पाहिजे. तरच आत्महत्येचा विचार नक्कीच येणार नाही.

- डॉ. विक्रम वैद्य, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.............................

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज -

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्येही वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. सकारात्मक विचार रुजविल्यास आत्महत्येचा विचार येणार नाही.

- डॉ. संदीप दिवेकर, मानसोपचार तज्ज्ञ,

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

.........................

२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या - ६७०

२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या - ६९५

जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या काळात झालेल्या आत्महत्या - २४८

..............................