शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

'सैन्य दलातील ९ हजार कॅप्टन, मेजर पदं आजही रिक्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:38 IST

सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांची खंत

डोंबिवली- सैन्य दलात जाण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेम असण्याची गरज आहे. शारीरिक दृष्ट्या थोडी कमतरता असल्यास त्यांची तयारी करून घेता येऊ शकते. निस्वार्थी बुद्धीने देशासाठी काही करण्याची मानसिकता असल्यास चांगले काम घडेल. आपल्याकडे सैन्यदलात भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. देशप्रेम आणि इच्छाशक्तीच्या अभावी ते अर्जदार सैन्यात भरती होऊ शकत नाहीत. आजही सैन्यदलातील ९ हजार जागा कॅप्टन आणि मेजर पद रिक्त आहेत, अशी खंत सेवानिवृत्त मेजर अच्युत देव यांनी व्यक्त केली.गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फे विद्यार्थी सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित व्हावी या उद्देशाने देव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी देव बोलत होते. स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप आणि गुरूकुल द डे स्कूल येथील विद्यार्थ्यांशी देव यांनी संवाद साधला. स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाघमारे, कार्यवाह दिपक कुलकर्णी उपस्थित होते.देव म्हणाले, १९६५ च्या लढाईची गोष्ट सांगताना त्यांनी अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा सांगितली. सैनिकांची शौर्यगाथा महत्त्वाची आहे. जाज्वल्य देशभक्ती महत्त्वाची असते. ते शिक्षण भारतीय सैन्यात दिले जाते. ते देशासाठी लढत असतात. पाकिस्तानने आपल्यावर कितीही हल्ले केले, तरी त्याला चोख उत्तर द्यायला आपले सैन्य दल सक्षमपणे उभे आहे. त्यामुळे या हल्ल्यांना घाबरण्याची गरज नाही. सैन्य दलात ज्या मानसिकतेची मुले यायला हवी आहेत ती येत नाहीत. सैन्य दलात तुम्ही किती हुशार आहात याला महत्त्व नाही. राष्ट्रप्रेम, प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी सैन्य दल नाही. कारण सैन्य दलात मोठ्या अधिकारी पदावरदेखील तेवढा पैसा मिळत नाही. सरकार तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईल याची काळजी घेते. मला विद्यार्थ्यांना उदास करायचे नाही पण सत्य परिस्थिती सांगत आहे. एखाद्याने सैन्य दलाला करियर म्हणून निवडल्यावर त्या ठिकाणाहून मागे वळता येणार नाही. वाघासारखे असला तरच सैन्यदलात जा. सैन्य दलात हुशारी, समन्वय, आणि मानसिकतेची गरज असते. सैन्य दलात येण्यासाठी कोणत्याही कोचिंगची गरज नाही. देशासाठी काही करण्याची मोठी इच्छाशक्तीची गरज असते. एनडीए ही संरक्षण दलाला पूरक अशी संस्था आहे. या संस्थेत सैन्य दलासह इतर ही शिक्षण पूर्ण करता येते. काही पालक मुलांना सैन्य दलात जाण्यापासून रोखतात त्यांना समपुदेशनची गरज आहे. कारगील युध्दात ५२५ सैनिक मारले गेले. त्यापेक्षा अधिक लोक ठाणे आणि डोंबिवलीमध्ये रस्ता अपघातात मारले जातात. जीवाला धोका सर्व ठिकाणी आहे. सैनिकाला आपला शत्रू कोण हे तरी माहीत असते. रस्ता अपघातात आपल्याला कोण मारणार आहे हेदेखील माहीत नसते. दुष्ट शक्तीना मारण्यासाठी योद्ध्याची गरज असते आणि त्यासाठीच सैन्य दलात गेले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहूल दामले, उपाध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त मंदार हळबे, अच्युत कºहाडकर, गौरी खुंटे,संयोजन समितीचे सहसंयोजक भूषण धर्माधिकारी, चिन्मय कुलकर्णी, अनिकेत घमंडी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि शिक्षक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनिल पांचाळ यांनी केले. 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान