शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

९० टक्के इमारती ‘ओसी’विना; अध्यादेश कागदोपत्रीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:30 IST

वाढीव बांधकामामुळे या इमारतींना ओसी मिळणे शक्य नसून त्यामुळे रहिवाशांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उल्हासनगरातील बहुतांश इमारतींचे अनधिकृत बांधकाम झाले असून त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा जास्त इमारतींना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळालेली नाही. वाढीव बांधकामामुळे या इमारतींना ओसी मिळणे शक्य नसून त्यामुळे रहिवाशांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.उल्हासनगरात सर्व नियम धाब्यावर बसवून इमारतींचे बांधकाम केले जाते. इमारतींमध्ये वाढीव बांधकाम जवळपास सर्वच बिल्डर करत असून महापालिका, राजकीय नेते, नगरसेवकांनी याकडे बघ्याची भूमिका घेतली आहे. तीन मजल्यांसाठी बांधकाम परवाना घेऊन, प्रत्यक्षात पाच ते सहा मजली इमारती उभ्या राहत आहेत. महापालिकेचे चार नगररचनाकार अनधिकृत बांधकामांमुळे यापूर्वी अडचणीत सापडले आहेत. तीन नगररचनाकार तर तुरुंगाची हवा खात असून आणखी दोन नगररचनाकारांनी दिलेले बांधकाम परवाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.महापालिका नगररचनाकार विभागाने दिलेल्या बांधकाम परवान्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरू आहे का, याची माहिती घेणे, हे नगररचनाकार विभागाचे काम आहे. प्रत्यक्षात या विभागाचा एकही अभियंता निर्माणाधीन इमारतींकडे फिरकत नाही. शहाड फाटक येथील कोणार्क रेसिडेन्सीमधील घराच्या चाव्यावाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गजांच्या हस्ते झाला. आश्चर्य म्हणजे, या संकुलालाही महापालिकेची ‘ओसी’ नाही. ‘ओसी’विना घरांच्या चाव्यांचे वाटप केल्याची टीका होताच, पालिकेला कोणार्क गृहसंकुलासमोर नामफलक लावावे लागले. मात्र, काही दिवसांतच हे फलकही गायब झाल्याने, पालिकेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. शहरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या महापालिका अधिकारी, स्थानिक नेत्यांचा याला आशीर्वाद असल्याची टीका होत आहे.बिल्डरांना काळ्या यादीत टाकामहापालिकेकडून बांधकाम परवाना मिळवल्यानंतर बिल्डर प्रत्यक्षात इमारतीमध्ये वाढीव बांधकाम करतात. हे अनधिकृत बांधकाम राजरोसपणे सुरू असते. पालिकेला या अनधिकृत कामाची भणक कशी लागत नाही, असा प्रश्न निर्माण झाला असून अशा बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.वास्तुविशारदांच्या परवान्यांचे नूतनीकरण नाहीइमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती बिल्डर आणि वास्तुविशारद महापालिकेला देत नाहीत. बिल्डरांना सहकार्य करण्याची भूमिका स्थानिक वास्तुविशारदांची असल्याने त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नाही, अशी धक्कादायक माहिती नगररचना विभागाने दिली. वाढीव बांधकाम केल्याने, बिल्डर ‘ओसी’साठी अर्जही करत नाही. नोटिसा देऊन बिल्डरांना बोलवावे लागत असल्याचे या विभागाचे म्हणणे असून ९० टक्क्यांपेक्षा जास्त इमारती ‘ओसी’विना असल्याची कबुलीही या विभागाने दिली.हजारो प्रस्ताव धूळखातशहरातील अवैध बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, राज्य शासनाने विस्थापितांचे शहर म्हणून अध्यादेश काढला. काही अटीशर्ती व दंडात्मक कारवाई आकारून अवैध बांधकामे नियमित करण्याची तरतूद या अध्यादेशात आहे. मात्र, गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये केवळ १०० बांधकामे नियमित झाली असून हजारो प्रस्ताव धूळखात पडून आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर