शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

क्लोरिन गळतीची ७ जणांना बाधा, भार्इंदरच्या अग्निशमन केंद्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:17 IST

भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.

मीरा रोेड : भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.भार्इंदर पश्चिमेस कमला पार्क येथे पालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र आहे. येथेच पालिकेचा जलकुंभ आहे. यातून पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो. त्यासाठी मुंबईच्या एक्वाटॅक एंटरप्रायझेस या कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा होतो. १६३ किलो वजनाच्या या सिलिंडरमध्ये १०० किलो क्लोरिन असतो. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास या सिलिंडरमधून क्लोरिनची गळती सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दलाचे सब फायर स्टेशन अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह लीडिंग फायरमन रवींद्र पाटील, फायरमन संतोष मशाळ, संजय म्हात्रे, रोहित पाटील, संतोष पाटील, धनीलाल गावित, चालक हर्षद अधिकारी, तुषार भोईर, पाणीपुरवठा विभागाचे विठ्ठल धोंगडे, व्हॉल्व्हमन उत्तरायन दोराईराज, सुरक्षारक्षक निखिलेश तिवारी यांनी गळती रोखण्यासाठी धाव घेतली.सिलिंडरच्या तळाकडून गळती होत असल्याने आधी साबण लावून गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर, दोघा जवानांनी सिलिंडरवर सतत पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, क्लोरिनच्या गळतीमुळे मदतकार्य करणाºया जगदीश पाटील, संजय म्हात्रे, संतोष माशाळ, रोहित पाटील, हर्षद अधिकारी, उत्तरायण, तिवारी यांना रुग्णालयात दाखल केले, तर बाजूला असणाºया रुची टॉवर, कमला पार्क इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सिलिंडरला जोडलेला पाइप कापून सिलिंडर भार्इंदर पश्चिमेस खाडीत टाकल्याचे अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे म्हणाले. सव्वातीन वाजता जवानांनी पुन्हा जाऊन खाडी परिसराची पाहणी केली. कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी शुक्रवारी आले. गळती रोखण्यासाठी केवळ अग्निशमन दलाच्या दोनच जवानांनी मास्क वापरले होते.भोंगळ कारभाराचा फटकाशुक्रवारी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते आदींनी रुग्णालयात जाऊन जवानांची भेट घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांचे जोखमीचे असलेले काम पाहता, त्याचा १० लाखांचा विमा पालिका काढत असे, पण वर्ष झाले पालिकेने विमाच काढलेला नाही. कर्मचाºयांची मेडिक्लेम सेवाही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वर्षभरापासून बंद आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक