शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

क्लोरिन गळतीची ७ जणांना बाधा, भार्इंदरच्या अग्निशमन केंद्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:17 IST

भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.

मीरा रोेड : भार्इंदर अग्निशमन केंद्रातील पाण्याच्या टाकीवर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाºया क्लोरिन गॅसची गळती होऊन, अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह एकूण ७ जणांना बाधा झाली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. रुग्णालयात दाखल केलेल्या तिघा जवानांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. यांच्या उपचाराचा खर्च पालिका देणार आहे.भार्इंदर पश्चिमेस कमला पार्क येथे पालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र आहे. येथेच पालिकेचा जलकुंभ आहे. यातून पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो. त्यासाठी मुंबईच्या एक्वाटॅक एंटरप्रायझेस या कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा होतो. १६३ किलो वजनाच्या या सिलिंडरमध्ये १०० किलो क्लोरिन असतो. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास या सिलिंडरमधून क्लोरिनची गळती सुरू झाली. त्यामुळे अग्निशमन दलाचे सब फायर स्टेशन अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह लीडिंग फायरमन रवींद्र पाटील, फायरमन संतोष मशाळ, संजय म्हात्रे, रोहित पाटील, संतोष पाटील, धनीलाल गावित, चालक हर्षद अधिकारी, तुषार भोईर, पाणीपुरवठा विभागाचे विठ्ठल धोंगडे, व्हॉल्व्हमन उत्तरायन दोराईराज, सुरक्षारक्षक निखिलेश तिवारी यांनी गळती रोखण्यासाठी धाव घेतली.सिलिंडरच्या तळाकडून गळती होत असल्याने आधी साबण लावून गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर, दोघा जवानांनी सिलिंडरवर सतत पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, क्लोरिनच्या गळतीमुळे मदतकार्य करणाºया जगदीश पाटील, संजय म्हात्रे, संतोष माशाळ, रोहित पाटील, हर्षद अधिकारी, उत्तरायण, तिवारी यांना रुग्णालयात दाखल केले, तर बाजूला असणाºया रुची टॉवर, कमला पार्क इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सिलिंडरला जोडलेला पाइप कापून सिलिंडर भार्इंदर पश्चिमेस खाडीत टाकल्याचे अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे म्हणाले. सव्वातीन वाजता जवानांनी पुन्हा जाऊन खाडी परिसराची पाहणी केली. कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी शुक्रवारी आले. गळती रोखण्यासाठी केवळ अग्निशमन दलाच्या दोनच जवानांनी मास्क वापरले होते.भोंगळ कारभाराचा फटकाशुक्रवारी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते आदींनी रुग्णालयात जाऊन जवानांची भेट घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांचे जोखमीचे असलेले काम पाहता, त्याचा १० लाखांचा विमा पालिका काढत असे, पण वर्ष झाले पालिकेने विमाच काढलेला नाही. कर्मचाºयांची मेडिक्लेम सेवाही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वर्षभरापासून बंद आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक