शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

६९ पूर्वीच्या जन्मदाखल्याची ठाणेकरांना अखेरची संधी ,जन्म-मृत्यू विभागाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:56 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नसेल त्यांना १९७० पूर्वीचे आपल्या माता-पित्यांचे वास्तव्याचे पुरावे सादर करण्याची सक्ती केली जात आहे.

ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नसेल त्यांना १९७० पूर्वीचे आपल्या माता-पित्यांचे वास्तव्याचे पुरावे सादर करण्याची सक्ती केली जात असल्याने देशभरात या कायद्यावरुन लोक रस्त्यावर उतरत असताना १९६९ पूर्वी अथवा नंतर जन्म झालेल्यांना परंतु जन्माची नोंद न केल्याने जन्मदाखला प्राप्त न झालेल्यांना तो मिळवण्याची अखेरची संधी ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने १४ मे २०२० पर्यंत उपलब्ध करुन दिली आहे. या मुदतीनंतर मात्र अशी संधी उपलब्ध होणार नसल्याने अशा व्यक्तींच्या नागरिकत्व नोंदणीबाबत अडचणी येऊ शकतात. कदाचित सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार ते भारतीय नागरीक म्हणवून घेण्यास अपात्र ठरतील.शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेताना, नोकरी प्राप्त करताना, तसेच अनेक बाबींसाठी जन्म दाखल्याची आवश्यकता भासते. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील नव्याने जन्मलेल्या सदस्यांच्या जन्म दाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. मात्र, आता १९६९ पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून जन्मदाखला मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.पूर्वीच्या काळी गर्भवती मातांसाठी प्रसूती व्यवस्था नसल्याने घरातच प्रसूती होत असे. त्यामुळे बाळाच्या जन्माची नोंद सहसा कुणी करीत नसत. शहरी भागातदेखील प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या बाळांच्या जन्माची नोंद रूग्णालयामार्फत होऊनही अनेकांनी जन्म दाखले घेतलेले नसत. त्यामुळे, नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंद करून जन्मदाखले मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसुचनेद्वारे हे जाहीर केले आहे. ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी १ जानेवारी २००० पूर्वी झालेली आहे, ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अशा सर्व नागरिकांना जन्मनोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना १९६९ पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांना जन्मनोंद करता येणार असून ही मुदत केवळ १४ मे २०२० पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. ज्यांच्याकडे ही कागदपत्रे उपलब्ध नसतील अशी मंडळी आपसुकच नागरिकत्व सिद्ध करु शकणार नाहीत.>नाममात्र विलंब शुल्कनवजात बालकांची नोंद २१ दिवसांच्या आत केल्यास जन्मदाखल्याची प्रथम प्रत मोफत दिली जाते. त्याच धर्तीवर अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही २० रु पये शुल्क आणि ५ रु पये एवढे नाममात्र विलंब शुल्क आकारून जन्म नोंदीचे प्रमाणपत्र मिळेल.