शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:32 IST

महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे शहरातील जनता दरबारावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा वाद रंगला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात ६०० हून अधिक नागरिकांनी व्यथा मांडल्या. पहिल्याच जनता दरबाराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नाईक यांनी, आपला जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

नाईक म्हणाले,  मी १९९५ मध्ये मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. आपली गाऱ्हाणी घेऊन सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच  जनता दरबार घेतला, असे नाईक म्हणाले.  जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईकांनीही जनता दरबार घ्यावापालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, याबद्दल नाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या, तर त्या सुटतील.

स्वबळावर महापालिका निवडणूक लढायला आवडेल; पण...  ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा आहे, असे माजी खा. संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता वनमंत्री नाईक यांनीही, मला स्वबळावर निवडणूक लढायला आवडते; पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक