शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:32 IST

महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे शहरातील जनता दरबारावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा वाद रंगला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात ६०० हून अधिक नागरिकांनी व्यथा मांडल्या. पहिल्याच जनता दरबाराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नाईक यांनी, आपला जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

नाईक म्हणाले,  मी १९९५ मध्ये मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. आपली गाऱ्हाणी घेऊन सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच  जनता दरबार घेतला, असे नाईक म्हणाले.  जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईकांनीही जनता दरबार घ्यावापालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, याबद्दल नाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या, तर त्या सुटतील.

स्वबळावर महापालिका निवडणूक लढायला आवडेल; पण...  ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा आहे, असे माजी खा. संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता वनमंत्री नाईक यांनीही, मला स्वबळावर निवडणूक लढायला आवडते; पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक