शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्रवाशांना लुटणारे ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:02 IST

लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

- पंकज रोडेकरठाणे : लग्नसराई अथवा मंगलसमयी अनेक समाजांत तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून शुभाशीर्वाद घेतले जात असले, तरी दुसरीकडे याच तृतीयपंथीयांच्या रेल्वेप्रवासातील वाढत्या उपद्रवामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रेल्वेस्थानकात आरपीएफ अथवा रेल्वे पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या वेळी अनेक तृतीयपंथी धावत्या लोकलमधून उतरून पटरीतून धावत सुटतात. मात्र, तरीही ठाणे आरपीएफने मागील चार वर्षांत सुमारे ९३७ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. यात पकडलेल्या तृतीयपंथीयांपैकी ६० टक्के तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.मुंबई उपनगरीय रेल्वेबरोबरच मेल-एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांची गेल्या काही दिवसांपासून वर्दळ वाढू लागली आहे. त्यांच्या अश्लील हावभाव करण्याच्या सवयीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या डब्यात जाऊन पैसे मागण्याची जुनी पद्धत असली, तरी आता जनरल डब्यातही त्यांचे प्रस्थ हळूहळू वाढत आहे. त्यातच, रेल्वेस्थानकात आरपीएफ कारवाई करत असल्यामुळे लोकल-मेल-एक्स्प्रेसमधून प्रवाशांकडून पैसे गोळा केल्यानंतर स्थानक येण्याअगोदर ही मंडळी चालत्या गाडीतून उतरते. अनेक तृतीयपंथी रेल्वे पटºयांमध्ये धावण्यात माहीर आहेत.त्यामुळे पटरीतून त्यांना पकडणे काहीसे अवघड जात असले, तरी आरपीएफकडून राबवल्या जाणाºया विशेष मोहिमेत अनेक तृतीयपंथी जाळ्यात अडकतात. मागील चार वर्षांत ठाणे आरपीएफने ९३७ तृतीयपंथीयांंवर कारवाई करून न्यायालयात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोटाची खळगी भरण्यासाठी मार्गतृतीयपंथीयांची कटकट नको म्हणून प्रवासी त्यांना पैसे देतात. दिवसभरात चांगली कमाई होत असल्याने आता स्त्रीवेशातील पुरुष तृतीयपंथीयांची संख्या वाढते आहे. नोकरी-व्यवसाय नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक पुरु ष हे तृतीयपंथीयांचा वेश करून भटकत असतात. ठाणे आरपीएफने ठाणे ते कल्याणदरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल ६० टक्कयांहून अधिक तृतीयपंथी स्त्रीवेशातील पुरु ष असल्याचे सांगण्यात आले.>एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तनरेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाºया तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येते. सर्वाधिक मेल-एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांशी गैरवर्तन करणाºया तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. ते एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनल) येथून सुटणाºया मेल-एक्स्प्रेस अथवा कल्याण स्थानकात चढून मुंबईकडे जाणाºया गाड्यांमध्ये बसतात. अप आणि डाउन मार्गांवरील बहुतांशी गाड्या ठाणे खाडीपुलावर सावकाश धावतात. याचाच फायदा घेऊन ते चालत्या गाडीतून उतरताना दिसून येतात. कारवाईत पकडलेल्या तृतीयपंथीयांकडून ५०० ते १५०० रु पये दंड वसूल केला जात असून आतापर्यंत ज्यांनी दंड भरला नाही, अशा १० टक्के तृतीयपंथीयांना जेलची हवा खावी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>भीक मागून प्रवाशांना नाहक त्रास देणाºयांविरोधात भारतीय रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई केले जाते. त्यानुसार, या वर्षातील जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत ठाणे-कल्याणदरम्यान ९३४ तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. तर, नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई आणखी तीव्र केली आहे.- राजेंद्र पांडव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ