शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

गर्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या टोळीकडून ५१ मोबाइल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:59 IST

जबरीने मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी याच्यासह सहा जणांच्या सराईत टोळीला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत.

ठळक मुद्देसहा जणांना अटकनऊ महिन्यांत ३८ लाखांचे मोबाइल हस्तगतउपायुक्तांच्या हस्ते नागरिकांना मोबाईलचे वितरण

ठाणे: एसटी, रेल्वे आणि बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणांसह रिक्षातून जाणारे प्रवासी तसेच पादचाºयांकडून जबरी मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी (२२, रा. कोपरी), प्रकाश कदम (३०, रा. राबोडी), अमित जगताप (३०, रा. ऐरोली) आणि उदयसिंग भंडारी (२२, रा. राबोडी ) आदी सहा जणांच्या सराईत गुन्हेगारांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यामध्ये परिमंडळ एकच्या विविध पथकांनी ३७ लाख ९८ हजार७५० रुपयांचे ३५१ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एका कायमस्वरूपी पथकाची स्थापना झोन एकचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या स्वामी यांनी मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाला मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाने झोन एकमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला. राकेश गुरुदासानीसारख्या सराईत सहा गुन्हेगारांकडून या पथकांनी चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले ५९ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना सोमवारी परत केले. हे मोबाईल परत मिळाल्यानंतर या फिर्यादींनी उपायुक्त स्वामी यांच्यासह तपास पथकाचे विशेष आभार मानले. ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डी. एस.स्वामी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक ए. आर. भंडारे, पोलीस उपनिरिक्षक जी.ए.केकाणे, पोलीस नाईक समाधान माळी, पोलीस नाईक आकाश जाधव, पोलीस नाईक एस. इ. चव्हाण, पोलीस शिपाई पी. बी. गादेकर, पोलीस हवालदार हिवाळकर यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन गेल्या तीन ही कामगिरी बजावल्याचे स्वामी यांनी सांगितले. या विशेष पथकाने गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३७ लाख ९८ हजार ७५० रुपयांच्या ३५१ मोबाईलचा शोध घेतला. यात परिमंडळ एक मधील चोरीच्या ३३ गुन्हयांमधील ३५ मोबाईल हस्तगत करुन २० आरोपींना अटक केली आहे.

‘‘ गहाळ झालेले किंवा चोरी झालेले मोबाईल परत मिळेल, याची अनेक सामान्य नागरिकांना शाश्वती नसते. परंतू, पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये नक्कीच एक विश्वास निर्माण होईल. यापुढेही ही मोहीम सुरु राहील. परंतू, नागरिकांनीही अशा घटना होत असतांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. संशयास्पद वस्तू दिसल्यास त्या पोलीस ठाण्यात आणून दिल्यास अनेक बाबी उघड होऊ शकता. तसेच साध्या वेषात राहून पोलिसांची कामगिरी दक्ष नागरिक घेऊ शकतात.’’डॉ. डी. एस. स्वामी., पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक