शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गर्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या टोळीकडून ५१ मोबाइल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:59 IST

जबरीने मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी याच्यासह सहा जणांच्या सराईत टोळीला ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत केले आहेत.

ठळक मुद्देसहा जणांना अटकनऊ महिन्यांत ३८ लाखांचे मोबाइल हस्तगतउपायुक्तांच्या हस्ते नागरिकांना मोबाईलचे वितरण

ठाणे: एसटी, रेल्वे आणि बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणांसह रिक्षातून जाणारे प्रवासी तसेच पादचाºयांकडून जबरी मोबाईल हिसकावणा-या राकेश गुरुदासानी (२२, रा. कोपरी), प्रकाश कदम (३०, रा. राबोडी), अमित जगताप (३०, रा. ऐरोली) आणि उदयसिंग भंडारी (२२, रा. राबोडी ) आदी सहा जणांच्या सराईत गुन्हेगारांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख १० हजारांचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यामध्ये परिमंडळ एकच्या विविध पथकांनी ३७ लाख ९८ हजार७५० रुपयांचे ३५१ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी एका कायमस्वरूपी पथकाची स्थापना झोन एकचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या स्वामी यांनी मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाला मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाने झोन एकमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला. राकेश गुरुदासानीसारख्या सराईत सहा गुन्हेगारांकडून या पथकांनी चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले ५९ मोबाईल हस्तगत करुन ते मूळ मालकांना सोमवारी परत केले. हे मोबाईल परत मिळाल्यानंतर या फिर्यादींनी उपायुक्त स्वामी यांच्यासह तपास पथकाचे विशेष आभार मानले. ठाणे पोलीस आयुक्त परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डी. एस.स्वामी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक ए. आर. भंडारे, पोलीस उपनिरिक्षक जी.ए.केकाणे, पोलीस नाईक समाधान माळी, पोलीस नाईक आकाश जाधव, पोलीस नाईक एस. इ. चव्हाण, पोलीस शिपाई पी. बी. गादेकर, पोलीस हवालदार हिवाळकर यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन गेल्या तीन ही कामगिरी बजावल्याचे स्वामी यांनी सांगितले. या विशेष पथकाने गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३७ लाख ९८ हजार ७५० रुपयांच्या ३५१ मोबाईलचा शोध घेतला. यात परिमंडळ एक मधील चोरीच्या ३३ गुन्हयांमधील ३५ मोबाईल हस्तगत करुन २० आरोपींना अटक केली आहे.

‘‘ गहाळ झालेले किंवा चोरी झालेले मोबाईल परत मिळेल, याची अनेक सामान्य नागरिकांना शाश्वती नसते. परंतू, पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये नक्कीच एक विश्वास निर्माण होईल. यापुढेही ही मोहीम सुरु राहील. परंतू, नागरिकांनीही अशा घटना होत असतांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. संशयास्पद वस्तू दिसल्यास त्या पोलीस ठाण्यात आणून दिल्यास अनेक बाबी उघड होऊ शकता. तसेच साध्या वेषात राहून पोलिसांची कामगिरी दक्ष नागरिक घेऊ शकतात.’’डॉ. डी. एस. स्वामी., पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक