शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

ठाणे जिल्ह्यातील ५०७ अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई!

By सुरेश लोखंडे | Updated: September 11, 2022 19:18 IST

यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

ठाणे : यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राज्य शासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आदींव्दारे तीन हजार ५०१ कोटी निधी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी मंजूर झाला आहे.यामध्ये ठाणे जिल्यातील ५०७ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी प्रशासनाने आधी पाच लाखांची तर आॅगस्टमधील नव्या वाढीव दरानुसार १० लाख १६ हजारांची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे.त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

             जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी जोरदार पाऊस पडत आहे. दुपारी उन पडत असून संध्याकाळी अचानक वीज आणि ढगांचा गडगडाटात पाऊस पडत असल्यामुळे सध्या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही अंशी खरीप पिकासही फटका बसत आहे. मात्र १ ते १४ जुलैदरम्यान जिल्हह्यात झालेल्या अतिवृष्टीची दखल घेत त्यातील ५०७ शेतकºयांना त्यांच्या ७१.६४ हेक्टर शेतातील विविध स्वरूपाच्या नुकसान भरपाईच्या रकमा आता सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हह्यातील बळी राजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा झालेल्या नुकसानीची भरपाई नवनिर्वाचित सरकारने त्वरीत देण्याचा निर्णय यशस्वी केल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान आहे.

             यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्यासाठी शनिवारी साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर करीत राज्य शासनाने सोमवारपासून तो आपत्तीग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची आदेशही जारी केले आहे. यामध्ये वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या हानीसाठी १३ हजार ६०० प्रति हेक्टर भरपाई लागू केल्याची शेतकºयांमध्ये चर्चा आहे. तर बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. यासाठी जिल्हह्यातील ५०७ शेतकºयांच्या नुकसानीचा पंचनामा तयार करून शासनास पाठवण्यात आलेला आहे. त्यास अनुसरूनन ही नुकसान भरपाई शेतकºयांना मिळणार आहे.

            जिल्ह्यातील मीरा भार्इंदर, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड, शहापूर आणि भिवंडी आदी तालुक्यांमध्ये ४८२ शेतकºयांच्या शेतातील ३३ टक्केच्यावर जिरायतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६८.७८ हेक्टरवरील भात पिकाचा समावेश आहे. तर मीरा भार्इंदर, मुरबाड आदी तालुक्यांमधील २४ शेतकºयांच्या २.४६ हेक्टरवरील भाजीपाल्याच्या नुकसानीचा समावेश आहे. तर शहापूरच्या एक शेतकºयांच्या फळबागेच्या नुकसानीची दखल घेऊन त्यास् नियमास अनुसरून भरपाई देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे