शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ५०७ अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई!

By सुरेश लोखंडे | Updated: September 11, 2022 19:18 IST

यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

ठाणे : यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राज्य शासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आदींव्दारे तीन हजार ५०१ कोटी निधी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी मंजूर झाला आहे.यामध्ये ठाणे जिल्यातील ५०७ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी प्रशासनाने आधी पाच लाखांची तर आॅगस्टमधील नव्या वाढीव दरानुसार १० लाख १६ हजारांची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे.त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

             जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी जोरदार पाऊस पडत आहे. दुपारी उन पडत असून संध्याकाळी अचानक वीज आणि ढगांचा गडगडाटात पाऊस पडत असल्यामुळे सध्या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही अंशी खरीप पिकासही फटका बसत आहे. मात्र १ ते १४ जुलैदरम्यान जिल्हह्यात झालेल्या अतिवृष्टीची दखल घेत त्यातील ५०७ शेतकºयांना त्यांच्या ७१.६४ हेक्टर शेतातील विविध स्वरूपाच्या नुकसान भरपाईच्या रकमा आता सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हह्यातील बळी राजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा झालेल्या नुकसानीची भरपाई नवनिर्वाचित सरकारने त्वरीत देण्याचा निर्णय यशस्वी केल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान आहे.

             यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्यासाठी शनिवारी साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर करीत राज्य शासनाने सोमवारपासून तो आपत्तीग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची आदेशही जारी केले आहे. यामध्ये वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या हानीसाठी १३ हजार ६०० प्रति हेक्टर भरपाई लागू केल्याची शेतकºयांमध्ये चर्चा आहे. तर बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. यासाठी जिल्हह्यातील ५०७ शेतकºयांच्या नुकसानीचा पंचनामा तयार करून शासनास पाठवण्यात आलेला आहे. त्यास अनुसरूनन ही नुकसान भरपाई शेतकºयांना मिळणार आहे.

            जिल्ह्यातील मीरा भार्इंदर, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड, शहापूर आणि भिवंडी आदी तालुक्यांमध्ये ४८२ शेतकºयांच्या शेतातील ३३ टक्केच्यावर जिरायतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६८.७८ हेक्टरवरील भात पिकाचा समावेश आहे. तर मीरा भार्इंदर, मुरबाड आदी तालुक्यांमधील २४ शेतकºयांच्या २.४६ हेक्टरवरील भाजीपाल्याच्या नुकसानीचा समावेश आहे. तर शहापूरच्या एक शेतकºयांच्या फळबागेच्या नुकसानीची दखल घेऊन त्यास् नियमास अनुसरून भरपाई देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे