शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

शाई धरणासाठी पालिकेची ५० कोटींची तरतूद?

By admin | Updated: March 24, 2017 01:13 IST

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात या धरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. भविष्यात ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणून त्याला मंजुरी मिळवली होती. २००७ मध्ये या धरणाला मुहूर्त सापडून जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला आणि धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. पालिकेने जरी या धरणाची परवानगी खेचून आणली असली तरीदेखील महासभेत लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या अनास्थेमुळे हे धरण उभारण्याची महापालिकेची क्षमता नसल्याचे कारण पुढे केले गेले. धरणाचे काम एमएमआरडीएने करावे व त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सांगण्यात आले होते. त्यावेळीच शाई धरण कागदावर राहणार, हे स्पष्ट झाले. एमएमआरडीएने या धरणाचे काम करण्यात अनास्था दाखवली आणि पालिकेच्या आशा निराशेत परावर्तित झाल्या. सत्ताधाऱ्यांनी त्याच वेळेस सतर्कता दाखवली असती, तर आज ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असतेच, शिवाय २०४६ पर्यंत ठाणेकरांची तहान भागू शकली असती. मागील वर्षी पाणीसंकट ओढवले आणि पुन्हा शाई धरणाचा मुद्दा चर्चेत आला. परंतु, पाऊस चांगला झाल्याने पुन्हा धरणाचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. (प्रतिनिधी)