शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 16, 2017 02:20 IST

मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे/कासा : मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाखालील वाडा व पालघर तालुक्यातील ४२ गावांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. तर बुधवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी साडेसहानंतर सुर्या धरणाचेही सर्व पाच दरवाजे उघडले आहेत.शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालीत पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.काही दिवस पावसाने दडी मारली असताना ठाणे, पालघर आणि मुंबईसह राज्यावर पाण्याचे संकट ओढवले होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील धरणे झपाट्याने भरू लागली आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळील मोडकसागर या धरणाच्या पातळीत या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांतच या धरणामधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुढील २४ तास पाऊस असाच बरसत राहिला, तर धरणामधील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. हा परिसरातील गावांना धोक्याचा इशारा ठरू शकतो. याकरिता, येथील सहायक जलअभियंत्यांनी या धरणाच्या टप्प्याखाली येणाऱ्या ४२ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. या यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त, आपत्कालीन विभाग, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघरचे तहसीलदार आदींचा समावेश आहे. तर, या धरण आणि नद्यांच्या टप्प्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गावांमध्ये दाधारे, जोशीपाडा, शेले, तिलसे पिंप्रोली, धीनदेपाडा, गाले, अनशेत, तुरी, सारसी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स बुद्रुक, शील, गेट्स खुर्द, अब्जे, आलमान, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर, सावरे, पाचूधारा, इंबुर, खडकीपाडा, मनोर, उधारापाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, देवानीपाडा, खामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटने, उंचवली, कोरीचापाडा, कोनपाडा आणि नवघर या गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वाडा आणि पालघर तालुक्यांतील आहेत. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी ५३५.२६ फूट टीएचडीएवढी आहे. त्यामुळे हे धरण केव्हाही पूर्ण भरून वाहू शकते. त्यामुळे या गावांना हा इशारा देण्यात आला आहे.४२३७ क्यूसेक्स विसर्गकासा : दोन दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सूर्या धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून ४ हजार २३७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातल्या शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण (धामणी) सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे ७६ टक्के भरले असून पाणी नियंत्रणासाठी शनिवारी संध्याकाळपासून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पेठ, म्हसाड येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणची वाहतूकही खोळंबून राहिली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दुर्घटनेचे वृत्त हाती आलेले नव्हते.