शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

‘समृद्धी’लगतची ४६ गावे एमएसआरडीसीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:43 IST

ठाण्यातील आमणे परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

अमर शैलालाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समृद्धी महामार्गाला सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमणे भागातील ४६ गावांची ‘आमणे नोड अधिसूचित क्षेत्र’ म्हणून घोषणा केली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास सोमवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतचा भिवंडी परिसरातील सुमारे ११५ चौरस किमी भाग आता एमएसआरडीसीच्या अधिपत्याखाली आहे.

भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या भागाच्या नियोजनबद्ध आणि संतुलित विकासाची जबाबदारी आता एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे. नगरविकास विभागाने त्याचा शासन निर्णय जारी केला असून, एमएसआरडीसीला भिवंडी तालुक्यातील ३२ गावे आणि कल्याण तालुक्यातील १४ गावे मिळून सुमारे ११ हजार ५०० हेक्टर भागासाठी प्रारूप विकास योजना तयार करून त्याची विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे. 

समृद्धी महामार्गासह, प्रस्तावित विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग हे या परिसरातून जातात. तसेच भविष्यात येथून जेएनपीटीसह वाढवणमधील प्रस्तावित बंदराला मालाची वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यातून परिसरात लॉजिस्टिक हब आणि वेअर हाऊसचा सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे. त्यातून एमएसआरडीसीची या भागासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी भिवंडीतील काही 

गावांमध्ये औद्योगिक विकास केंद्र प्रस्तावित होते. त्यामुळे या गावांसाठी एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. राज्य सरकारने एमआयडीसीची नेमणूक रद्द करून ही गावे एमएसआरडीसीला दिली आहेत.

कोणत्या गावांचा समावेश भिवंडी तालुका : आमणे, आतकोली, अर्जुनाली, बापगाव, भादाने, भवाले, भोईरगाव, बोरीवली तर्फ सोनाळे, चिराडपाडा, देवरुंग, ईताडे, जानवल, खांडवल, किरवली तर्फे सोनाळे, कुकसे, लोनाड, मुथवल, नांदकर, पडघा (सिटी), पिसे, सांगे, सापे, सावड, शिवनगर, तळवली तर्फे सोनाळे, उसरोली, वाहुली, वाशेरे, आन्हे, बोरीवली तर्फे राहूर, कुरुंद आणि वांद्रे कल्याण तालुका : गुरवली, खडवली, कोंडेरी, नाडगाव, निंबावली, ओझरर्ली, राये, सांगोडे, वासुंद्री, आंबिवली तर्फे वासुंद्री, चिंचवली, मोस, पितांबरेनगर आणि उटणे  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग