शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४४८ पाड्यांत तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 07:16 IST

उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे - उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे महापालिकांसह नगरपालिकांची पाणीकपातीतून काही अंशी सुटका झाली. मात्र मागील अनुभव लक्षात घेता यंदाही १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणांती उघडकीस आले. अंबरनाथ, कल्याण या शहरी तालुक्यांसह भिवंडी, मुरबाड आणि तलावांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूरच्या सर्वाधिक गावांना टंचाई भेडसावणार आहे.शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना मागील वर्षी १८ टँकरव्दारे पाणीपुरवठा झाला. मुरबाडच्या चार गावपाड्यांना तीन टँकरने गेल्यावर्षी पाणीपुरवठा केला. या उन्हाळ्यात मात्र शहापूरची ७८ गावे, १९० पाड्यांना पाणीटंचाई भासेल, तर मुरबाडची २४ गावे- ६५ पाडे, भिवंडीची दोन गावे- ३८ पाडे, कल्याणची १० गावे- १७ पाडे आणि अंबरनाथमधील सात गावे व १७ पाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता सर्व्हेअंती निश्चित करण्यात आली. शहापूरच्या ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार असून त्यासाठी ९० लाखांची तरतूद केली आहे, तर मुरबाडचे १४ गावे आणि ३० पाड्यांसाठी १९ लाख खर्चून टँकरव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून दहा गावे आणि ११ पाड्यांच्या योजना दुरूस्त होतील. शहापूर तालुक्यात खर्डी येथील दोन कोटींच्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तालुक्यास योजना मंजूर केलेली नाही.नव्या विंधन विहिरीटंचाईच्या या काळात यंदा तलावातील गाळ काढण्याचे नियोजन नाही. तसेच विहिरीही खोल केल्या जाणार नाहीत. पण एक कोटी ७० लाख खर्च करून ३८ गावे आणि १२९ आदिवासी पाड्यांसाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जातील.असा होईल खर्च : सर्वाधिक शहापूर तालुक्यात चार कोटी ११ लाख, मुरबाडला ७३ लाख ६० हजार रूपये, भिवंडीसाठी २६ लाख, कल्याणसाठी ५१ लाख आणि अंबरनाथसाठी ८७ लाख २० हजार रूपयांच्या खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी