शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

४४८ पाड्यांत तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 07:16 IST

उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे - उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे महापालिकांसह नगरपालिकांची पाणीकपातीतून काही अंशी सुटका झाली. मात्र मागील अनुभव लक्षात घेता यंदाही १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणांती उघडकीस आले. अंबरनाथ, कल्याण या शहरी तालुक्यांसह भिवंडी, मुरबाड आणि तलावांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूरच्या सर्वाधिक गावांना टंचाई भेडसावणार आहे.शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना मागील वर्षी १८ टँकरव्दारे पाणीपुरवठा झाला. मुरबाडच्या चार गावपाड्यांना तीन टँकरने गेल्यावर्षी पाणीपुरवठा केला. या उन्हाळ्यात मात्र शहापूरची ७८ गावे, १९० पाड्यांना पाणीटंचाई भासेल, तर मुरबाडची २४ गावे- ६५ पाडे, भिवंडीची दोन गावे- ३८ पाडे, कल्याणची १० गावे- १७ पाडे आणि अंबरनाथमधील सात गावे व १७ पाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता सर्व्हेअंती निश्चित करण्यात आली. शहापूरच्या ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार असून त्यासाठी ९० लाखांची तरतूद केली आहे, तर मुरबाडचे १४ गावे आणि ३० पाड्यांसाठी १९ लाख खर्चून टँकरव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून दहा गावे आणि ११ पाड्यांच्या योजना दुरूस्त होतील. शहापूर तालुक्यात खर्डी येथील दोन कोटींच्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तालुक्यास योजना मंजूर केलेली नाही.नव्या विंधन विहिरीटंचाईच्या या काळात यंदा तलावातील गाळ काढण्याचे नियोजन नाही. तसेच विहिरीही खोल केल्या जाणार नाहीत. पण एक कोटी ७० लाख खर्च करून ३८ गावे आणि १२९ आदिवासी पाड्यांसाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जातील.असा होईल खर्च : सर्वाधिक शहापूर तालुक्यात चार कोटी ११ लाख, मुरबाडला ७३ लाख ६० हजार रूपये, भिवंडीसाठी २६ लाख, कल्याणसाठी ५१ लाख आणि अंबरनाथसाठी ८७ लाख २० हजार रूपयांच्या खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी