शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४१६ रुग्ण सापडले; ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:58 IST

Corona News thane : उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी ४१६ रुग्णांची वाढ झाली असून  नऊ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ४० हजार ६१९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ९१० झाली आहे. 

     ठाणे शहरातून आज ९६ रुग्णांची नोंद झाली असता आता या शहरात ५४ हजार ६७१ बाधीत रुग्ण नोंदले आहेत. तर, तीन मृत्यू झाल्याने येथील  मृतांची संख्या एक हजार २९७  झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ११८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५५ हजार ८६७ बाधीत झाले असून एक हजार ९४ मृत्यूची नोंद झाली आहे.

     उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत सहा हजार ४२१ असून मृतांची संख्या ३५१ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज ४४ रुग्णांची, तर एका मृताची नोंद आहे. या शहरात आता बाधितांची २५ हजार २१२ झाली असून मृतांची संख्या ७८१ आहे. 

     अंबरनाथमध्ये १२ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या आठ हजार १९७ असून मृत्यू २९९ नोंदले आहेत. बदलापूरला १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधीत आठ हजार ७३६ झाले आहेत.या शहरात आज एक मृत्यू असून ११४ मृत्यूची नोंद झाली  आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात २० रुग्णांची नोंद असून एका मृत्यूची नोंद आहे. या परिसरात आता बाधीत १८ हजार ६८९ आणि मृत्यू ५७८ आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस