शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

४०३ जणांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: February 9, 2016 02:18 IST

जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी ठिकाणी साफसफाईचा अभाव, ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी ठिकाणी साफसफाईचा अभाव, ठिकठिकाणी पडलेला कचरा यामुळे हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे एका अहवालावरून उघड झाले. वर्षभरात हिवतापाचे १२६ रुग्ण असतानाच डेंग्यूचे सर्वाधिक ४०३ रुग्ण आढळले. यातील सुमारे २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वायरल इन्फेक्शन सतत वाढत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तापाच्या रुग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. यात थंडीतापासह डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या आढळत आहे. वर्षभरात हिवताप व डेंग्यूचे सुमारे ५२९ संशयित आढळले. डेंग्यूच्या या संशयितांमधील दगावलेल्या २८ जणांपैकी महापालिका क्षेत्रातील १५ रुग्ण असून नगरपालिका क्षेत्रातील सहा, आदिवासी भागातील तीन आणि ग्रामीण भागातील चार रुग्ण दगावल्याची गंभीर बाब निदर्शनात आली आहे. हिवतापापेक्षा वर्षभरात जीवघेण्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकांसह अन्यही ठिकाणी तो वाढत असल्याचे म्हणणे वावगे नसल्याचे बोलले जात आहे. संशयितांमधून सुमारे ३२ डेंग्यूचे रुग्ण निश्चित करता आले आहेत. यातील सहा रुग्ण दगावल्याची नोंद आहे. तर हिवतापाच्या केवळ तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण, ही हास्यास्पद बाब असली तरी प्रत्यक्षात दगावलेल्या २८ पैकी काही पट रुग्ण वर्षभरात दगावले आहेत. परंतु, त्यास विहीत नमुन्यात नोंदण्याची संधी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.