शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डोंबिवली पश्चिमेला पाण्याची ४० मीटर व्यासाची पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाणी गेले वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 20:18 IST

पश्चिमेकडील भागात महात्मा गांधी रोडनजीक सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात जेसीबीने मारलेल्या धडकेमुळे पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली.

डोंबिवली: पश्चिमेकडील भागात महात्मा गांधी रोडनजीक सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात जेसीबीने मारलेल्या धडकेमुळे पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास घडली. स्कायवॉकखाली ही घटना घडली असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले, पण लाखो लीटर पिण्याचे पाणी वाया गेले. खबरदारी म्हणुन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने काही काळासाठी पुरवठा बंद केला.जेव्हा ही घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकच्याही वरती पाण्याचे फवारे उडाले. तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ कारंजे उडाले होते, त्यामुळे पश्चिमेला जाणारी रस्ता वाहतूक गुप्ते रोड, तसेच फुले रोडचा काही भागापर्यंत बंद झाली होती. दोन तासांनी संध्याकाळी सहानंतर पाणी कमी झाले, पाणी पुरवठा बंद झाल्याने त्या विभागाच्या कर्मचा-यांनी तातडीने काम हाती घेतले. मध्य रात्री उशिरापर्यंत ते काम सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. परिणामी काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. घटनास्थळी तातडीने पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, आणि यूद्धपातळीवर काम हाती घेतले.

टॅग्स :thaneठाणे