शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:35 IST

पालकमंत्र्यांना दिले पत्र

डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रातील ३० ते ४५ वर्षांपासून जुन्या इमारतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) संदर्भात आपल्या दालनात बैठक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली.

महानगरपालिका अस्तित्वात येण्या अगोदर येथे ग्रामपंचायत राजवट होती. परिसरातील भुमिपुत्र शेतकरी बांधव शेती करून आपला उदर निर्वाह चालवीत होते. त्याच बरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना घर मिळावा व आपल्या कुटुंबाचाही उदर निर्वाह चालवावा म्हणून त्याकाळात अल्पदरात सामान्य माणसांना परवडणारी घरे भाडेतत्वावर बांधून देण्यात आली. त्यानंतर १९८३ ला महानगर पालिका अस्तित्वात आली त्यावेळी १९८३ ते १९९५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९५ साली महापालिकेची प्रथम निवडणूक झाली. त्यावेळी आपल्या शहराचा विकास व्हावा म्हणून परिसरातील आगरी कोळी भूमिपुत्रांनी आपल्या जमीनी विविध आरक्षणा साठी दिल्या.

त्यातून रस्ते, मध्य रेल्वे, दिवा वसई रेल्वे, बागबगीचे, खेळाचे मैदान, शाळा कॉलेज, पाणीपुरवठा योजना, विद्युत पुरवठा, औधोगिक विकास (एम. आय. डी.सी.), सी. आर. झेड., बफर झोन तसेच आताचे रेल्वे प्रलंबित कॉरिडॉर, माणकुली ते शीळ फाटा बायपास रस्ता (रिंगरूट) तसेच विविध विकास कामासाठी आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जमिनी आरक्षित केल्यामुळे मूळचा आगरी कोळी भुमिपुत्र भुमिहीन झाला असून त्यावर उध्वस्त होण्याची वेळ आल्याचे केणे म्हणाले.

महापालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्र हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत काळापासून ते आजपर्यंत सुमारे ३० ते ४५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारती आता धोकादायक परिस्थिती मध्ये आहेत सदर इमारतीला सुमारे दोन, अडीच चटईक्षेत्र वापरण्यात आले आहे. परंतु महापालिकेच्या नियमा प्रमाणे सध्या एक चटई क्षेत्र (एफ. एस. आय.) देण्यात येत आहे. तसेच जुन्या व धोकादायक बांधकामांना सध्याच्या अटी व शर्ती प्रमाणे जमीन मालक यांना मोबदलाही मिळत नाही व तेथे राहत्या रहिवाश्याना घरे देणेही शक्य होत नाही. असाच प्रश्न बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्माण झाला होता. त्याला उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गरजा समजून त्यांना न्याय देण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून दिले व जमीन मालक व रहिवाश्यांचा प्रश्न सोडवला.

त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्रला (४ एफ. एस. आय.) मंजुरी मिळावी जेणे करून जमीन मालकाला (घरमालक) त्याचा मोबदला मिळेल व राहत्या रहिवाश्याना त्यांचे घर मिळेल. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये उत्पन्नाची भर होईल व सरकारी जमिनीवरील महसूल शासनाला मिळेल. या आधीही तत्कालीन मुख्यमंतत्री देवेंद्र फडणवीस यांना २४/१२/२०१८ व २५/०६/२०१९ रोजी सदर मागणी संदर्भात निवेदन दिले होते. तसेच विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही १७ डिसेंबर ही निवेदन दिलेल आहे. परंतु नगरविकास विभागाचे मंत्री शिंदे असल्याने त्यांच्यासोबत चर्चा होणे गरजेचे आहे.तरी सदर अर्जाचा गांभीर्यपूर्वक विचार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून जमीन मालक (घरमालक) व रहिवाश्याना योग्य न्याय मिळवून द्यावा असे केणे म्हणाले

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे