शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ३५ जोडपी विवाहबद्ध, दिवसभर जोडप्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:45 IST

अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली.

ठाणे : अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली. डोक्याला बाशिंग बांधूनच ती आली होती. त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही नटूनथटून आले होते. अक्षयतृतीयेला शुभमुहूर्त मानून १० जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी नविन वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशीचा मुहूर्त साधून अनेक विवाह इच्छुक जोडपी विवाह बंधनात अडकतात. अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्याची जोडप्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. एखादी अनोखी तारीख असो वा व्हॅलेण्टाईन डे, गुढीपाडवा, १ जानेवारी अशा दिवसांचे विवाहोच्छुक जोडपी विवाहबंधनात अडकण्यासाठी मुहूर्त साधत असतात. मंगळवारी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून विवाहनोंदणी कार्यालयात ३५ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. गेल्यावर्षी २५ जोडपी विवाहबद्ध झाली होती. या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार, जवळचे नातेवाईक उपस्थित होते. विवाह सोहळा पार पडल्यावर या जोडप्यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.या दिवशी विवाहबंधनात अडकण्यासाठी या जोडप्यांनी एक महिना आधीच आॅनलाईन पद्धतीने नोटीस दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयात येऊन नोंदणी पद्धतीने विवाह केला. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यालयात रांग होती, जोडप्यांच्या चेहºयावर उत्साह दिसून येत होता, अशी माहिती कनिष्ठ लिपीक पी. व्ही. काळबगार यांनी लोकमतला दिली. याच दिवशी लग्न करायचे असे आम्ही ठरविले होते, असे विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी सांगितले.अक्षय तृतीयेच्या दिवशी गर्दी असते म्हणून आदल्या दिवशीच ३८ जोडपी विवाहबद्ध झाली. यात दिव्यांग जोडप्याचाही समावेश होता, असे विवाहनोंदणी कार्यालयाच्या पी.व्ही. काळबगार म्हणाल्या. बुधवारीही अशीच गर्दी राहू शकते. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाmarriageलग्न