शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:27 AM

चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.

ठाणे - चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मे मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये ५५० हून अधिक शिक्षक पालघरमध्ये फेकले गेले. पालघरची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला. बहुसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाण्यात व नोकरी पालघरमध्ये अशी स्थिती निर्माण झाली. काही शिक्षकांना घरापासून शाळेपर्यंत पोचण्यासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत होता.त्यामुळे या शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष पवार यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाºयांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाºयांचा सत्कार केला. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर बदलीच्अखेर सुभाष पवार यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.च्ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र