शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे ३२१ शिक्षक अखेर ठाणे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:27 IST

चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.

ठाणे - चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मे मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये ५५० हून अधिक शिक्षक पालघरमध्ये फेकले गेले. पालघरची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला. बहुसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाण्यात व नोकरी पालघरमध्ये अशी स्थिती निर्माण झाली. काही शिक्षकांना घरापासून शाळेपर्यंत पोचण्यासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत होता.त्यामुळे या शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष पवार यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाºयांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाºयांचा सत्कार केला. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.ठाण्यात जागा रिक्त झाल्यानंतर बदलीच्अखेर सुभाष पवार यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात ३२१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.च्ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र